मुंबईतील 'या' पाच रेल्वे स्थानकांचं रुपडं आता पालटणार; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा उत्सवाच्या वेळी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. याचपार्श्वभूमीवर आता रेल्वेकडून स्टेशनवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातील. महाकुंभमेळ्यादरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे रेल्वेला सतर्कता बाळगण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी एक बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. हा निर्णय उत्सव आणि महाकुंभातील अनुभव लक्षात घेऊन घेण्यात आले आहेत.
देशातील ६० प्रमुख रेल्वे स्थानके नेहमीच खूप गर्दीची असतात. आता या स्थानकांच्या बाहेर कायमस्वरूपी प्रतीक्षालय बनवले जातील. प्रवाशांना त्यांची ट्रेन येणार असेल तेव्हाच प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी असेल. यामुळे स्टेशनवरील गोंधळ कमी होईल आणि प्रवाशांना ये-जा करणं ही सोपं होईल. या योजनेची चाचणी नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पटना स्थानकांवर सुरू झाली आहे.
या ६० स्थानकांवर पूर्ण प्रवेश नियंत्रण असेल. म्हणजेच ज्यांच्याकडे कन्फर्म तिकिटे आहेत त्यांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. सुरक्षा वाढवण्यासाठी आणि हालचाली सुलभ करण्यासाठी, सर्व बेकायदेशीर मार्ग बंद केले जातील. यामुळे तिकीट नसलेल्या लोकांची गर्दी कमी होईल आणि स्टेशनवरील सुरक्षा देखील वाढेल.
महाकुंभमेळ्यात दोन नवीन प्रकारचे पादचारी पूल (FOBs) खूप उपयुक्त ठरले. एक १२ मीटर (४० फूट) रुंद आणि दुसरा ६ मीटर (२० फूट) रुंद. हे एफओबी आता सर्व प्रमुख स्थानकांवर बांधले जातील. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होईल आणि सुरक्षा देखील वाढेल. स्थानके आणि आजूबाजूच्या परिसरात भरपूर कॅमेरे बसवले जातील. हे कॅमेरे गर्दीवर लक्ष ठेवतील आणि कोणत्याही घटनेवर त्वरित कारवाई करण्यास मदत करतील. यामुळे सुरक्षा आणखी मजबूत होईल. याशिवाय, मोठ्या स्थानकांवर विशेष युद्ध कक्ष बांधले जातील. येथे सर्व विभागांचे अधिकारी एकत्र काम करतील. तसेच सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर स्टेशन डायरेक्टर म्हणून एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असेल. ते स्टेशन आणि गाड्यांच्या क्षमतेनुसार तिकिटांच्या विक्रीवरही नियंत्रण ठेवू शकतील.