Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालघरचे मच्छिमार शासनाच्या दुर्लक्षतेला पडले बळी? मृत्यूच्या आकड्यात वाढ झाल्याने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

पालघर किनारपट्टीवर मच्छिमारांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. बोट अपघातांमध्ये अनेक मच्छिमारांचा बळी जात असून सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अनेक भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 21, 2025 | 11:38 AM
Palghar News

Palghar News

Follow Us
Close
Follow Us:
  • पालघरचे मच्छिमार सरकारच्या दुर्लक्षतेला पडले बळी?
  • मृत्यूच्या आकड्यात वाढ झाल्याने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर
  • शेकडो मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात
पालघर (वा.) पालघर जिल्ह्याचा : विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि समृद्ध मत्स्यसंपदा ही जिल्ह्याची ओळख असली तरी २०१० पासून आजपर्यंत येथील समुद्रात घडलेल्या बोटींच्या अपघातांनी मच्छिमार समाजावर मोठे संकट ओढवले आहे. वादळी हवामान, तांत्रिक बिघाड, जुनाट नौका, तसेच आंतरराष्ट्रीय समुद्रसीमेबाबत असलेली अपुरी माहितीमुळे २१७ मच्छिमार पाकिस्तानच्या कैदेत आहेत. त्यापैकी २२ मच्छिमार २०२५ च्या बॅकलिस्टनुसार सोडले गेले असले १९४ मच्छिमार मरण यातना भोगत आहेत. गेले एक दशकात २६ भारतीय मच्छिमारांचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. मृत्यूंची नेमकी संख्या वेगवेगळ्या अहवालांमध्ये बदलते, मात्र दरवर्षी अशा घटना घडत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. २०२५ मध्ये पालघर जिल्ह्याचे ८ मच्छिमार पाकिस्तानने ताब्यात घेतले आहेत, ज्यामध्ये खलाशी जखमी झाला होता.

वसई किल्ल्यावर चित्रीकरणाच्या नावाखाली हुल्लडबाजी; पुरातन वास्तूंचे नुकसान झाल्याने इतिहासप्रेमी नाराज

पालघर किनारपट्टीवर ३० पेक्षा जास्त बोट अपघात

२०१० नंतर पालघर किनारपट्टीवर किमान ३० पेक्षा जास्त मोठे बोटी अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये किमान ४० हून अधिक मच्छिमारांचा मृत्यू, तर अनेकजण आजही बेपत्ता असल्याचे चित्र आहे. मार्च २०२५ मध्ये झाई गावाजवळ बोट उलटून चार मच्छिमारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याआधीही डहाणू, वसई आणि सफाळे किनारपट्टीवर अशा अनेक घटना घडल्या असून काही प्रकरणांत मृतदेहही सापडले नाहीत.

भारत-पाक समुद्रसीमेजवळ शेकडो मच्छीमार पकडले गेले

पालघर आणि लगतच्या किनारपट्टीवरील काही मच्छिमार चुकून आंतरराष्ट्रीय समुद्रसीमा ओलांडल्याने पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये मच्छिमारांना महिनोन्महिने पाकिस्तानच्या तुरुंगात राहावे लागते. त्यांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा राजनैतिक पातळीवर हस्तक्षेप झाल्यानंतरच या मच्छिमारांची मुक्तता होते.

स्थानिक संघटनेच्या अहवालानुसार गेल्या दशकात भारत-पाकिस्तान समुद्रसीमाजवळून मासेमारी करणारे शेकडो मच्छिमार पकडले गेले आहेत, ज्यात अनेक जण अजूनही कैदेत आहेत आणि काहींचा मृत्यू देखील झाला आहे. पाकिस्तानच्या जेलमध्ये १९४ भारतीय मच्छिमार असून त्यामध्ये पालघरचे १८ मच्छिमार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये पालघर जिल्ह्याच्या ८ मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. तर सध्या २६ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. महाराष्ट्रातील मच्छिमार समाजाचे नेते, रामकृष्ण तांहेल यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेबाबत मच्छिमारांना ज्ञान नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. यासाठी भारत सरकारने आवश्यक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Web Title: Fishermen death toll rises in palghar today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • maharashtra news
  • navarashta news
  • Palghar news

संबंधित बातम्या

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन
1

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर
2

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर

वसई किल्ल्यावर चित्रीकरणाच्या नावाखाली हुल्लडबाजी; पुरातन वास्तूंचे नुकसान झाल्याने इतिहासप्रेमी नाराज
3

वसई किल्ल्यावर चित्रीकरणाच्या नावाखाली हुल्लडबाजी; पुरातन वास्तूंचे नुकसान झाल्याने इतिहासप्रेमी नाराज

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
4

तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.