Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातही राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

महायुती सरकारबाबत जी 10 वर्षांची अँटी इन्कबन्सी आहे. ती त्यांना कमी करायची आहे. राष्ट्रपती राजवट लावून काहीतरी करुन काहीतरी चांगल होईल याबाबत आशावादी राहायचे, असा विचार सत्ताधारी करु शकतात. राष्ट्रपती राजवट लागू केली तर आपल्याला सरकार टिकवता येईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2024 | 07:21 AM
विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसलं तरीही यंदा विरोधी पक्षनेता असणार? काय सांगतो नियम?

विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसलं तरीही यंदा विरोधी पक्षनेता असणार? काय सांगतो नियम?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली आहे. सत्तेतील पक्षांना जर वाटत असेल की, आता निवडणूक घेतली तर आपला पराभव निश्चित आहे, तर एकच मार्ग असतो. तो म्हणजे राष्ट्रपती राजवट लावणे, असे ते म्हणाले.

हेदेखील वाचा : भाजपच्याच कार्यकर्त्याने दाखल केली भाजप खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार; त्याचं कारण…

पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महायुती सरकारबाबत जी 10 वर्षांची अँटी इन्कबन्सी आहे. ती त्यांना कमी करायची आहे. राष्ट्रपती राजवट लावून काहीतरी करुन काहीतरी चांगलं होईल, याबाबत आशावादी राहायचे, असा विचार सत्ताधारी करु शकतात. राष्ट्रपती राजवट लागू केली तर आपल्याला सरकार टिकवता येईल. फक्त राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पॉलिटिकल असेल’.

निवडणूक घेणार नसाल तर आरक्षणाचा काय उपयोग?

हरयाणाची निवडणूक 8 ऑक्टोबरला संपुष्टात येईल. अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. आज आपण पाहतोय, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्ष झाले निवडणुका झालेल्या नाहीत. संविधानातून आपण पॉलिटिकल आरक्षण दिले. निवडणूक घेणार नसाल तर आरक्षणाचा काय उपयोग आहे? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.

हरियाणा, महाराष्ट्राची निवडणूक एकत्र होणे गरजचेचे

चव्हाण पुढे म्हणाले, 2009 मध्ये मतदारसंघांची पुर्नरचना झाली, तेव्हापासून आत्तापर्यंत तीन निवडणुका झालेल्या आहेत. त्या हरयाणा आणि महाराष्ट्राच्या एकत्र झालेल्या आहेत. त्या एकत्र होणे स्वाभाविक आहे. पण यावेळी विशेष परिस्थिती किंवा थातूरमातूर कारण सांगून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : ‘येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था’; अजित पवारांना पुन्हा डिवचलं

Web Title: Possibility of implementation of presidents rule in maharashtra too says prithviraj chavan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 07:13 AM

Topics:  

  • political news
  • Presidents Rule

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण
1

Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

Eknath Shinde एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर
2

Eknath Shinde एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर

घराच्या मोहाला घालावा आवर! लालू यादव आणि राबडी देवी होणार का बेघर?
3

घराच्या मोहाला घालावा आवर! लालू यादव आणि राबडी देवी होणार का बेघर?

तिजोरीच्या चाव्यांवरुन रंगलं राजकारण! जोरदार राजकीय वादंगानंतर अजित पवारांचा यु-टर्न
4

तिजोरीच्या चाव्यांवरुन रंगलं राजकारण! जोरदार राजकीय वादंगानंतर अजित पवारांचा यु-टर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.