Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हात उसाच्या रसाचा ‘थंडावा’; रसवंतीगृहांबाहेर अबालवृद्धांची गर्दी

कडक उन्हात घशाला पडलेली कोरड शमवण्यासाठी आता ठिकठिकाणच्या चौकात घुंगरांचा आवाज घुमू लागला असून, अबालवृद्धांची पावले आपोआप रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 22, 2026 | 03:30 PM
कडक उन्हात उसाच्या रसाचा 'थंडावा'; रसवंतीगृहांबाहेर अबालवृद्धांची गर्दी

कडक उन्हात उसाच्या रसाचा 'थंडावा'; रसवंतीगृहांबाहेर अबालवृद्धांची गर्दी

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी/विजया गिरमे : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आपले दाहक रूप दाखवायला सुरुवात केली आहे. दुपारच्या सुमारास उष्णतेचा पारा ३४ अंशाच्या पार गेल्याने अंगाची लाहीलाही होत असून, नागरिकांना घराबाहेर पडणे असह्य होऊ लागले आहे. अशा या कडक उन्हात घशाला पडलेली कोरड शमवण्यासाठी आता ठिकठिकाणच्या चौकात घुंगरांचा आवाज घुमू लागला असून, अबालवृद्धांची पावले आपोआप रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत.

 

फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा

साधारणतः मार्चमध्ये उन्हाळ्याला सुरुवात होते, मात्र गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यापासूनच उकाडा जाणवू लागला आहे. यावर्षी देखील मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आता शीतपेये आणि विशेषतः उसाचा रस मोठा दिलासा देत आहे.

कृत्रिम पेयांपेक्षा नैसर्गिक रस ‘स्वस्त आणि मस्त’

बाजारात सध्या विविध प्रकारची रंगीत आणि कृत्रिम घटक वापरून तयार केलेली शीतपेये उपलब्ध आहेत. ही पेये प्यायल्यानंतर क्षणभर थंडावा मिळत असला, तरी आरोग्याच्या दृष्टीने ती घातक ठरू शकतात. याउलट, उसाचा रस हा पूर्णपणे नैसर्गिक असून तो खिशालाही परवडणारा आहे. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी उसाचा रस हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

आरोग्यासाठी ‘अमृत’ की ‘धोका’?

तज्ज्ञांचे मत : उसाचा रस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असला, तरी तो पिताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:

फायदे : उसाच्या रसात मुबलक प्रमाणात खनिजे असतात. हे पेय यकृतासाठी पोषक असून नैसर्गिक साखर असल्याने शरीरातील थकवा झटकन दूर होतो.

बर्फाचा वापर टाळावा : उसाचा रस विशेषतः बर्फाशिवाय प्यायल्यास तो शरीराला अजिबात अपायकारक ठरत नाही. रसवंतीगृहात वापरला जाणारा बर्फ अनेकदा अशुद्ध असतो, ज्यामुळे घसा दुखी किंवा जलजन्य आजार होऊ शकतात.

स्वच्छतेची खात्री करा : रसवंतीचालकाने ऊस नीट धुतलेला असल्यास आणि मशीन स्वच्छ असल्यास संसर्गाचा धोका राहत नाही.

आजकाल खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये, अवघ्या १० ते २० रुपयांत उसाचा रस उपलब्ध होतो. कडक उन्हामध्ये हे नैसर्गिक थंडगार पेय म्हणजे सर्वसामान्यांसाठी अमृतासमान आहे. बऱ्याच लोकांना रसात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या शुद्धतेबद्दल शंका असते, त्यामुळे ग्राहक आता बर्फाशिवाय रस पिण्याला जास्त पसंती देत आहेत. रसाची चव वाढवण्यासाठी आम्ही त्यात लिंबू, आले, काळे मीठ आणि जलजीरा मसाला वापरतो, ज्याचा शरीराला फायदाच होतो. -वर्षा पाटील, आकुर्डी, विक्रेता

काविळ आणि गैरसमज

अनेकांचा असा समज आहे की उसाचा रस पिल्याने काविळ होते. मात्र, सत्य हे आहे की अस्वच्छ पाणी किंवा दूषित बर्फामुळे ‘हिपॅटायटीस’चा धोका असतो. स्वच्छ आणि ताजा रस हा उलट यकृताला बळकटी देण्याचे काम करतो. त्यामुळे रसवंतीगृहाबाहेर गर्दी करताना नागरिकांनी स्वच्छतेची खात्री करूनच रसाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून शरीराला दिलासा देण्यासाठी उसाचा रस अत्यंत प्रभावी आहे. उसाच्या रसात नैसर्गिक ‘सुक्रोज’ साखर असल्याने शरीराला त्वरित ऊर्जेचा पुरवठा होतो आणि तहानही शमते. मात्र, आरोग्यदृष्ट्या स्वच्छतेची योग्य काळजी घेणे अनिवार्य आहे. जेथे स्वच्छतेची परिपूर्ण खात्री दिली जाते किंवा तुम्ही स्वतः त्याची खात्री करून घेत असाल, तर बर्फ विरहित ताजा उसाचा रस पिण्यास काहीच हरकत नाही. विशेषतः ज्या ठिकाणी बर्फाच्या शुद्धतेबद्दल शंका असेल, तिथे बर्फ टाळणेच अतिउत्तम ठरते. — डॉ. ललितकुमार धोका, अध्यक्ष, भारतीय वैद्यकीय संघटना

Web Title: Due to the scorching heat citizens are flocking to drink sugarcane juice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान
1

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी
2

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
3

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

World Meteorological Day : काँक्रीटच्या जंगलात हरवली हिरवाई; वाढत्या धुलीकणांमुळे पिंपरीत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
4

World Meteorological Day : काँक्रीटच्या जंगलात हरवली हिरवाई; वाढत्या धुलीकणांमुळे पिंपरीत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.