Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: ‘पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना…”; ‘या’ कार्यक्रमात काय म्हणाले सुरेश प्रभू?

शेखर गायकवाड यांनी नवीन पिढीला निसर्गाशी जोडण्यासाठी प्रत्यक्ष नदी, तलाव, डोह येथे नेऊन अनुभव देण्याची गरज व्यक्त केली. नद्या व तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास मानवी स्थलांतर थांबवता येते, असे सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 26, 2025 | 03:05 PM
Pune News: ‘पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना…”; ‘या’ कार्यक्रमात काय म्हणाले सुरेश प्रभू?
Follow Us
Follow Us:
भविष्यात मानवी अस्तित्वच धोक्यात येऊ शकते
पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण ही अत्यावश्यक गरज
पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना कमी-अधिक प्रमाणात भेडसावतोय

पुणे: जागतिक पातळीपासून स्थानिक स्तरापर्यंत पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण (environment) झाले नाही, तर भविष्यात मानवी अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज असल्याचे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘जलमित्र पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष, ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व निवृत्त आयएफएस अधिकारी डॉ. अजित पटनाईक यांना डॉ. सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला सांगलीचे निवृत्त जिल्हाधिकारी व यशदा, पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक व सचिव डॉ. अरूणचंद्र पाठक, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील तसेच जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी उपस्थित होते.

सिनारमाससाठी पर्यावरणाचा बळी! एमआयडीसीच्या बेकायदेशीर कत्तलीवर भाजप नेत्यांचा संताप, गुन्हे दाखल करण्याची मागणी

डॉ. सुरेश प्रभू पुढे म्हणाले की, पाण्याचा प्रश्न सर्वच घटकांना कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. या प्रश्नाशी निगडित जमीन, जंगल, जैवविविधता, पक्ष्यांचे स्थलांतर असे अनेक पैलू असून त्यांचा समग्र विचार करून वैयक्तिक, सार्वजनिक आणि संस्थात्मक पातळीवर काम होणे आवश्यक आहे. परागीभवनामुळे शेतीची सुपीकता वाढते आणि आजवर कोणतेही विज्ञान परागीभवनाला पर्याय ठरू शकलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शेखर गायकवाड यांनी नवीन पिढीला निसर्गाशी जोडण्यासाठी प्रत्यक्ष नदी, तलाव, डोह येथे नेऊन अनुभव देण्याची गरज व्यक्त केली. नद्या व तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास मानवी स्थलांतर थांबवता येते आणि स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारताना डॉ. अजित पटनाईक यांनी चिलिका सरोवर मृतावस्थेतून बाहेर काढताना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन

याच वेळी वनराईचे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वनराईचे विश्वस्त सागर धारिया यांना विशेष सन्मान देण्यात आला. ‘पाणी वाचवा’ या संदेशाचा स्टीकरही यावेळी प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले. सुनील जोशी यांनी पुरस्कारामागील भूमिका मांडली. प्रा. डॉ. मंगेश कश्यप यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. दत्ता मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले, तर प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Web Title: Former minister and chancellor of rishihood university said water conservation and protection is needful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • pune news
  • water

संबंधित बातम्या

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित
1

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश
2

वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

Pune MH 12 RTO  Number Series Change: पुण्याची ‘MH-12’ ही ओळख बदलणार?; ‘ZZ’ मालिका संपल्याने RTO चा नवा प्लॅन
3

Pune MH 12 RTO Number Series Change: पुण्याची ‘MH-12’ ही ओळख बदलणार?; ‘ZZ’ मालिका संपल्याने RTO चा नवा प्लॅन

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.