Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल

कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी ती राख पाण्यात सोडून देण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत हीच प्रथा रूढ आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2025 | 05:39 PM
Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल

Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल

Follow Us
Follow Us:
व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती राख पाण्यात सोडून देण्याची परंपरा
लोहोट कुटुंबाचा अभिनव उपक्रम 
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घेतला पुढाकार

सोनाजी गाढवे/पुणे: कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी ती राख पाण्यात सोडून देण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत हीच प्रथा रूढ आहे. मात्र, तिला फाटा देऊन पर्यावरणाचा समतोल राखणारा उपक्रम गंगापूर बुद्रुक (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील लोहोट परिवाराने नुकताच राबवला. त्याचे अनुकरण सर्वांनी करावे, असे आवाहन या परिवाराने केले आहे.या गावातील विठ्ठलराव लोहोट (मोकाशी) यांच्या पत्नी सरूबाई यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी निधन झाले. अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी परंपरेनुसार फक्त थोडीशी राख घोडनदीच्या पाण्यात सोडण्यात आली व उर्वरित सर्व राख त्यांच्या शेतातील झाडांच्या मुळाशी लावण्यात आली. त्यांचे पुत्र गणपत लोहोट व गंगापूर बुद्रूक ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमासाठी पुढाकार घेतला व यापुढे सर्वांनीच याचे अनुकरण करावे, असा आग्रह त्यांनी धरला आहे.सरूबाईंचे पुतणे उद्धव लोहोट यांच्या मनात हा विचार अनेक वर्षे घोळत होता. मात्र, इतर कुणाच्या घरातील दु:खद प्रसंगी असा विचार मांडणे त्यांना प्रशस्त वाटले नाही. चुलतीच्या निधनानंतर त्यांनी हा विचार त्यांचे बंधू गणपतराव यांना बोलून दाखवला आणि त्यांच्यासह ग्रामस्थांनीही या विचाराला पाठिंबा देत कृती केली.

… म्हणून आमच्यापासून सुरुवात केली!

‘ग्रामीण भागात इलेक्ट्रिक स्मशानभूमी नाहीत. त्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी कमीत कमी एक झाड सर्व विधी करताना जाळलेच जाते. साहजिकच हवेचे प्रदूषण होतेच. शिवाय त्यानंतर ती राख पाण्यात टाकल्याने पाणी प्रदूषणही होते. ही राख झाडांना टाकल्याने जाळले गेलेले एक झाड दुसरीकडे वाढवल्याचे समाधान आणि जलप्रदूषण रोखण्यातही हातभार लागेल. हे कार्य दुसऱ्या कुणाला सांगून होणार नव्हते. त्यामुळे आम्ही आमच्यापासूनच सुरुवात केली,’ अशा भावना सरूबाईंचे पुतणे उद्धव लोहोट यांनी व्यक्त केल्या.

अंत्यसंस्कारानंतरची राख पाण्यात सोडल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. अनेकांच्या अंत्यसंस्कारप्रसंगानंतर हे दृश्य पाहून यामुळे किती जलप्रदूषण होत असेल, याबाबत चिंता वाटायची. हीच राख झाडांच्या मुळांशी टाकली, तर त्यांनाही खत म्हणून तिचा वापर होईल, जलप्रदूषण रोखण्यासही हातभार लागेल. या विचाराने आमच्या आईच्या निधनानंतर आम्ही ती राख झाडांना टाकण्याचा निर्णय घेतला.

– गणपतराव लोहोट, मुलगा

 

Web Title: Instead of water pyre ashes are applied to trees lohot family ambegaon navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • navarashtra special
  • navarashtra special story
  • pune news

संबंधित बातम्या

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त
1

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड
2

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
3

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

World Poha Day 2026: सुदामाच्या पोटलीपासून ते इंदौरच्या रस्त्यांपर्यंत; जाणून घ्या भारताच्या आवडत्या नाश्त्याची रंजक कहाणी
4

World Poha Day 2026: सुदामाच्या पोटलीपासून ते इंदौरच्या रस्त्यांपर्यंत; जाणून घ्या भारताच्या आवडत्या नाश्त्याची रंजक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.