Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बटेंगे-कटेंगे’ची भाषा संविधानाशी प्रतारणाच; काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचं विधान

राज्यातील निवडणुकीत ‘लोकशाही राज्य व्यवस्थेच्या’ कार्याच्या लेखा-जोख्यावर चर्चा अपेक्षित असते. मात्र, घटनात्मक पदांवरील नेते यांनी ‘जाती-धर्माचे ध्रुवीकरण’ करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न अविवेकी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 27, 2024 | 01:26 PM
Gopal Tiwari

Gopal Tiwari

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : घटनात्मक पदांवरील सत्ताधाऱ्यांनी सत्तारूढ होताना घेतलेली शपथ ही औपचारिकता नसून, संविधानिक प्रजासत्ताक भारताच्या जनतेप्रती घटनात्मक बांधिलकी असल्याचे सत्ताधारी नेते सोयीस्करपणे विसरत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

हेदेखील वाचा : Eknath Shinde News Update: मोठी बातमी! मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार; एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप?

गोपाळ तिवारी म्हणाले, ‘खरेतर निवडणूक काळात, सत्ताकाळात जनतेप्रती केलेल्या कामाचा लेखा-जोखा देण्याऐवजी ‘धर्म-जाती’च्या नावे ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणे हे संविधानविरोधी कृत्य असून, निवडणूक आयोग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने, लोकशाहीसाठी ही बाब दुर्दैवी असल्याचे गोपाळ तिवारी यांनी सांगितले. ‘भारतीय संविधान दिना’च्या औचित्याने राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना सुमनांजली वाहण्यात आली. ते पुढे म्हणाले की, ‘नुकत्याच झालेल्या राज्यातील निवडणुकीत ‘लोकशाही राज्य व्यवस्थेच्या’ कार्याच्या लेखा-जोख्यावर चर्चा अपेक्षित असते. मात्र, घटनात्मक पदांवरील नेते यांनी ‘जाती-धर्माचे ध्रुवीकरण’ करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न अविवेकी आहे. १४० कोटींच्या देशात अल्पसंख्याक भारतीय मुस्लिम मात्र १८ कोटींच्या घरात असताना, सत्ताधारी भाजपकडून आगपाखड होणे हास्यास्पद असून, सामाजिक सुरक्षा राखण्यात भाजप सरकार अपयशी ठरत असल्याची पावती आहे’.

स्वातंत्र्य संग्रामात सर्वधर्मियांचे योगदान

स्वातंत्र्य संग्रामात सर्वधर्मियांचे योगदान असताना, संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष व समाजवाद’ शब्द काढण्याबाबतचा महत्वपूर्ण निकाल ‘सर्वोच्च न्यायालयाने’ काल संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला देऊन भारतीय संविधानाची व्याख्या ही स्वातंत्र्य, समता, बंधुता व समानता भिमुख’ असल्याचे सुस्पष्ट केल्याचे समाधान असल्याचे गोपाळ तिवारी यांनी यावेळी सांगितले.

संविधानाची तत्वे अंगिकारण्याची गरज

भारतीय नागरिकाने संविधानाची तत्वे अंगिकारण्याची गरज आहे. तरच आम्ही भारतीय नागरिक असे आपण म्हणू शकतो, असे विधान, पश्चिम महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सचिन दुर्गाडे यांनी यावेळी केले. संविधानातील मतदानाचा हक्क ईव्हीएमच्या वावटळीत हरवला काय? असे वाटायला लागले असल्याचे ॲड. संतोष जाधव यांनी सांगितले. भारतीय संविधानाचे वाचन, प्रसारण व जागरुकता ही प्रत्येक भारतीयाने अंगीकृत करणे ही काळाची गरज असल्याचे ॲड. संदिप ताम्हणकर यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : Adani Bribery Case: कंपनीने लाचखोरी केली नाही, ती चूक अधिकाऱ्यांची; अदानींनी फेटाळले अमेरिकेचे आरोप

Web Title: Language of batenge katenge is against the constitution says gopal tiwari nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 01:26 PM

Topics:  

  • Gopal Tiwari
  • Maharashtra Political News

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.