१४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस करवाढ न करता सभागृहात मान्यता देण्याचा निर्णय झाला आहे. पक्ष बैठकीत नगरसेवकांनी एकमताने भूमिका घेतली असून लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
अक्षय तृतीया निमित्त डब्ल्यू.आय.टी. जैन टेंपल येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. प.पू. मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनातून त्याग, संयम आणि आत्मशुद्धीचा संदेश देण्यात आला.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदग्रहण समारंभात आमदार देवेंद्र कोठे यांनी बांधकाम व्यावसायिकांमुळे विकासाचा आलेख उंचावल्याचे सांगितले. पायाभूत सुविधा आणि शहरी विकासात या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली 'स्वीकृत सदस्य' (नामित सदस्य) नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असून, यासंदर्भात अधिकृत अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.
सध्या पश्चिम रेल्वेकडे एकूण ११२ रेक असून, यात ९६ रेक प्रवाशांच्या सेवेत, तर १६ रेक देखभाल दुरुस्तीसाठी राखीव असतात. आता या ११२ रेकमध्ये ज्येष्ठांसाठी राखीव कपार्टमेंट तयार करण्याची सुरुवात झालेली…
सीबीएसई इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये फिजिक्सवाला संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभर उल्लेखनीय यश मिळवले असून, तिघांनी १०० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल नोंदवला.
पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत.
Amravati Crime News : अमरावतीतील कमल रेसिडेन्सीमधील एक फ्लॅट सध्या चर्चेत आहे. हा फ्लॅट दोन मित्रांच्या कहाणीशी जोडला गेला आहे, ज्यामुळे परतवाडा सेक्स स्कँडल उघडकीस आले आणि त्यांची काळी कृत्ये…
महाराष्ट्र सरकारने बाल संगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’ प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम आता राज्यभरातील १२१ संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्सुकता वाढवणारी नांदी म्हणून राज्यभर ‘साहित्य जागर’ हा व्यापक उपक्रम राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती प्रवर्ग व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येते.
पुणे शहरातील प्रायोगिक रंगभूमीला तरुण पिढीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना, याच रंगभूमीकडे ज्येष्ठ पिढीचा ओढा मात्र कमी होत असल्याचे सध्या दिसून येत आहे.
बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छतागृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत. त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
शहापूर तालुक्यातील जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत असून, याचा परिणाम वन्यजीव आणि पर्यावरणावर गंभीरपणे होत आहे. वाढत्या आगीच्या घटनांमुळे हिरवाई धोक्यात आली आहे.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे 80 टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती.
धाराशिव येथील माविमला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून, बचतगटांच्या बळावर महिलांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली आहे.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ही बैठक झाली.
रखरखत्या उन्हामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान वाढत्या उष्प्यामुळे शहरासह महामार्गावर सुध्दा दुपारी वाहनांची रहदारीच्या संख्येत कमालीची घट दिसत असल्याचे दिसते.