Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : “मतदार चोर, खुर्ची सोड” ; मतदार चोरीविरोधात काँग्रेसचा कॅन्डल मार्च

लोकांनी केलेल्या मतदानाची चोरी होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर रायगड काँग्रेसने कॅन्डल मार्चचं आयोजन केलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 15, 2025 | 03:18 PM
Raigad News : “मतदार चोर, खुर्ची सोड” ; मतदार चोरीविरोधात काँग्रेसचा कॅन्डल मार्च
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग :  नागरिकांनी केलेल्या मतांची चोरी केल्यामुळे सत्ताधारी सरकार सत्तेत आलं आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे आता या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडमध्ये राज्य सरकारविरोधात काँग्रेसने कॅन्डल मार्च काढला.

शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला ‘ब्रेक’; सार्वजनिक बांधकाम नव्हे तर पुणे महापालिकेवर जबाबदारी; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मतदार यादीतील घोळ आणि मतदार चोरीच्या आरोपांवरून रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे १४ ऑगस्ट रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. “मतदान चोर, खुर्ची सोड” या घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतदार यादीतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाले. जिल्हा मुख्यालय अलिबाग येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मशाल मोर्चाची सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

Thane News : आरोग्यसेवा होणार ऑनलाईन; प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी टॅबचे वितरण

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, सरचिटणीस ॲड श्रद्धा ठाकूर, सरचिटणीस नंदा म्हात्रे, काँग्रेस तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, ज्येष्ठ नेते तोडणकर गुरुजी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला आघाडी, युवक काँग्रेस, विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलकांनी भारतीय जनता पक्षावर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून सत्तेवर गैरमार्गाने येण्याचा आरोप केला.काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मतचोरी हा केवळ राजकीय मुद्दा नसून लोकशाही प्रक्रियेवर घाला असल्याचे सांगत भविष्यातही हा लढा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Web Title: Raigad news voter thief leave the chair congress candle march against voter theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Alibaug
  • Nationalist Congress Party
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
1

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
2

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
3

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी
4

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.