
संतोष पेरणे : माथेरान शहरात येणारे पर्यटक यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पर्यटक सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात.त्यामुळे माथेरान शहरातील पर्यटन वाचवण्यासाठी माथेरान शहर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.मात्र माथेरान बचाव समितीच्या माथेरान बंदच्या निवेदनात माथेरान येथील आदिवासी लोकांचे रस्त्यावरील स्टॉल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान त्याबाबत माथेरान डोंगरातील आदिवासी देखील आक्रमक झाले असून जंगल बचाव – आदिवासी बचाव अशी भूमिका आदिवासी संघटनेने घेतली आहे.
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणारे पर्यटक यांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी माथेरान मधील व्यावसायिक आणि माथेरान मधील नागरिक यांच्याकडे पोहचल्या आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून माथेरान पर्यटन बचाव समिती कडून या पर्यटक फसवणुकीबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.त्यानुसार प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून माथेरान पर्यटन बचाव समितीने १७ मार्च ची डेडलाईन प्रशासनाला दिली आहे.त्या माध्यमातून माथेरान बचाव समिती कडून जे निवेदन प्रशासनाला दिले आहे त्यात १७ वा मुद्दा हा आदिवासी लोकांच्याबद्दल असल्याने माथेरान बंदचे बाबत गदारोळ आहे.माथेरान पर्यटन बचाव समितीच्या निवेदनात दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन या दरम्यान व्यवसाय करणारे आदिवासी लोकांचे स्टॉल हटविण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
माथेरान शहर वगळता डोंगरात असंख्य आदिवासी वाड्या असून त्या वाड्यांमध्ये राहणारे लोक हे व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावून बसतात. त्यात माथेरानचे डोंगरात राहणारे लोक हे मुलवासी आहेत.असे असताना देखील आदिवासी लोकांच्या विषयी अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न करणारे माथेरान पर्यटन बचाव समिती यांच्या विरुद्ध आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आदिवासी समाज हा डोंगर पट्ट्यात राहत असून त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार करतात.त्यामुळे आदिवासी कार्यक्रर्त्यांनी जंगल बचाव आदिवासी बचाव असा नारा दिला आहे.
जैतू पारधी आदिवासी कार्यकर्ते
माथेरान मध्ये कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसताना दीडशे वर्षांपासून घोडे चालवणे, दूध व्यवसाय,जंगली मेवा विकण्याचे व्यवसाय करीत आहेत.असे असताना देखील माथेरान मधील बचाव समिती आदिवासी लोकांच्या मुलावर उठली असून त्यांचा रोजगार हिरवण्याचा विचार करीत आहे हे चुकीचे असून माथेरान मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वन जमिनीवर दुकाने थाटली आहेत त्यांचे काय? ते तुमचे गाववाले आहेत म्हणून त्याला वेगळा न्याय का?
सनी चंचे माजी अध्यक्ष टॅक्सी संघटना
दस्तुरी नाका ते अमनलॉज स्टेशन पर्यंत रस्त्यालगत असलेली पाठविक्रते उठवण्यात यावे.मुळात हे विक्रेते आपल्या माथेरान शेजारील परिसरातील आदिवासी बांधव आहेत आणि त्याचा घर या विकण्यासाठी आलेल्या बांधवांवर चालत आहे. जर ते अतिक्रमण करून व्यवसाय करत असतील तर मग माथेरान मध्ये अमनलॉज पासून माथेरान पर्यंत खुप असे माथेरान मधील नागरिक रस्त्यालगत व्यवसाय करतात मग ते अतिक्रमण नाही का.यावरून असे दिसते की माथेरान येथे फक्त माथेरान मधील नागरिक व्यवसाय धंदा करू शकतो. बाहेरील नागरिकांनी येथे व्यवसाय करायला यायचा नाही का ? असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.