Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

तालुक्याचा पूर्वभाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केल्यानंतर राजनाला कालव्यात सोडले जाते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 01, 2026 | 02:39 PM
Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
Follow Us
Close
Follow Us:
  • शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई,
  • गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्याचा पूर्वभाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केल्यानंतर राजनाला कालव्यात सोडले जाते. या पाण्यावर 40 गावातील शेतकरी दुबार शेती करीत असतात. दरम्यान राजनाला कालव्यात पाणी आल्याने शेतात पाणी वळवून जमीन ओली करण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत, मात्र 20 दिवस पाणी उशिरा सोडण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.

राजनाला कालव्याची निर्मिती कर्जत पूर्व भागातील शेती ओलिताखाली आणण्यासाठी झाली. पुढे त्या कालव्याचे पाणी शेतीसाठी दरवर्षी दिले जात असतांना वेळेवर कालाव्याची दुरुस्ती होणे गरजेचे असतांना ती न झाल्यामुळे कालवे अनेक ठिकाणी पोकळ झाले होते. शेवटी 2011 मध्ये राज्य सरकारने राजनाला कालाव्याची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर केला. साधारण 2000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्याचा डावा कालवा 21 किलोमीटरचा आहे. सध्या राजनाला कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने सर्व भागात शेती केली जात आहे. यावर्षी सावळा गावाच्या शिवारात देखील पाणी पोहचले असल्याने भाताची शेती त्या भागात अनेक वर्षांनी बहरणार आहे.कारण राजनाला कालव्याची दुरुस्तीचे काम सुरु झाल्यापासून म्हणजे किमान 14-15 वर्षे या भागात कालव्याचे पाणी पोहचत नव्हते. मागील दोन वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अमित पारधे यांनी नियोजनबद्ध पणे कालव्यांच्या दुरुस्तीची अर्धवट पूर्ण केली आणि त्यामुळे कालव्यातुन पाणी सर्व भागात पोहचु लागले आहे.

यावर्षी 29 डिसेंबर रोजी राजनाला कालव्याच्या झिरो बंधाऱ्यातून पाणी कालव्यात सोडले गेले असून आतापर्यंत कालव्याच्या 15 किलोमीटर हुन अधिक भागातून पाणी पुढे पुढे जात आहे.मात्र एक किलोमीटर लांबीचा झिरो बंधारा मधून जाणारे पाणी पुढे उजवा कालवा,डावा कालवा,पोटल कालवा आणि हेदवली कालव्यातून पाणी पुढे जात असते. राजनाला कालवा परिसरातील 25 गावातील शेतकरी 2000 हुन अधिक हेक्टर जमिनीवर भाताची शेती घेत.मात्र मागील पाच वर्षे दुरुस्तीसाठी बंद असलेल्या राजनाला कालव्यात पूर्ण क्षमतेने पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे.त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी मुख्य कालव्यातून पोट कालव्यातून आपल्या शेतात येणार खात्रीने 25 गावातील शेकडो शेतकऱ्यांनी जमिनीत लागवड कारण्यासाठी भाताची नवनवीन वाण बाजारातून खरेदी करून ठेवली होती.

Raigad News: खोपोली हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू; आ. महेंद्र थोरवेंवर केले गंभीर आरोप

रत्ना जातीच्या वाणाला सर्वाधिक पसंती शेतकरी देत असतात. हायब्रीड जातीची वाण यांचे पीक हातात येण्यासाठी किमान 125 दिवसांचा आणि कधी त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे उन्हाळी शेती करतांना वेळेचे नियोजन महत्वाचे असल्याने रत्ना जातीच्या वाणाला अधिक पसंती शेतकरी देत असतात, राजनाला मुख्य कालव्यात पाणी सोडले गेले, त्यानंतर ते पाणी शेतात पोहचले असून पोटनाल्यातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वळवून शेते ओली करून ठेवली आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या घरी असलेल्या पॉवर ट्रेलर किंवा ट्रॅक्टर च्या नांगराच्या माध्यमातून शेताची नांगरणी सुरु केली आहे.परंतु हवामान बदल यामुळे शेतकरी यावर्षी देखील मे महिन्यात पाऊस झाला तर काय करायचे? या भीतीने त्रस्त आहेत. गतवर्षी राजनाला कालवा भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्येच भाताचे पीक भिजून गेले होते. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कालव्यात पाणी सोडण्याची शेतकऱ्यानं अपेक्षा होती. नवीन वर्षाच्या शेतात पाणी येऊ लागले असल्याने शेतकरी नाराज आहेत.

Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ

Web Title: Karjat news delay in releasing water for agriculture villagers express displeasure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय
1

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर
2

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर

Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ
3

Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप
4

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.