Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray :’समितीचा अहवाल येऊ दे किंवा न येऊ दे…’; हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतरही राज ठाकरेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र सरकारने आज पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हा जीआर रद्द करावा यासाठी ठाकरे बंधुंनी ५ जुलै रोजी एल्गार पुकारला होता.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 29, 2025 | 08:47 PM
'समितीचा अहवाल येऊ देत किंवा न येऊ देत...'; हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतरही राज ठाकरेंचा सरकारला इशारा

'समितीचा अहवाल येऊ देत किंवा न येऊ देत...'; हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतरही राज ठाकरेंचा सरकारला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र सरकारने आज पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हा जीआर रद्द करावा यासाठी ठाकरे बंधुंनी ५ जुलै रोजी एल्गार पुकारला होता. मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे सरकारने निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी अख्खं पत्र लिहिलं असून या पत्रातून स्पष्ट भूमिका माडंली आहे.

Breaking News : अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द, लोकभावनेपुढे सरकारची नरमाईची भूमिका

राज ठाकरेंचं पत्र जसं च्या जसं

शासनाच्या शिक्षण विभागाने नुकतीच पहिलीपासून त्रिभाषा सूत्रांतर्गत सक्तीने शिकवण्यात येणारी हिंदी भाषा रद्द केली असून, या निर्णयाचे श्रेय कोणत्याही राजकीय डावपेचाला न देता राज ठाकरे यांनी मराठी जनतेच्या संघटित विरोधाला दिले आहे. एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुद्यावर आवाज उठवला आणि त्यानंतर आंदोलनाचा जोर वाढत गेला, याची आठवणही या पत्रात त्यांनी करून दिली आहे.

राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, शासनाने जरी निर्णय मागे घेतला असला तरी तो सरकारच्या स्वेच्छेने झालेला नाही, तर मराठी जनतेच्या एकजुटीच्या दबावामुळे घ्यावा लागला आहे. हिंदीच्या अट्टाहासामागे सरकारवर नक्की कोणाचा दबाव होता, हे आजही एक गूढ राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

 

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका… — Raj Thackeray (@RajThackeray) June 29, 2025

“मोर्चा झाला असता तर…”

मनसेने या मुद्द्यावर जाहीर मोर्चा काढण्याची तयारी जाहीर केल्यानंतर अनेक पक्ष, संघटना यात सामील होण्यासाठी पुढे आल्या. हा मोर्चा प्रत्यक्षात झाला असता तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण होईल इतका विशाल झाला असता. सरकारने याच संभाव्य एकजुटीचा धसका घेत माघार घेतली असावी, असा सूचक उल्लेखही त्यांनी केला आहे.

शासनाने निर्णय मागे घेतल्यानंतर लगेचच नव्याने समिती नेमण्याची घोषणा केली आहे. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत लिहिलं आहे — “समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, असे प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत.” ही भूमिका सरकारने कायम लक्षात ठेवावी, असाही स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

Mumbai Morcha : ठाकरे बंधूंच्या मोर्चोला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही; राजकीय वातावरण तापणार

या पत्रात राज ठाकरे यांनी मराठी जनतेला उद्देशूनही संदेश दिला आहे की, आपली भाषा आणि अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. “तुमच्या अस्तित्वाला नख लावायला आपलेच लोकं बसलेत,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Raj thackeray reaction on maharashtra government withdraw hindi language gr latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 08:41 PM

Topics:  

  • Hindi Language
  • Maharashtra Government
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज
1

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
2

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.