
माहीम विधासनभा मतदारसंघावरून मनसे आणि शिंदे गटातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे. जे बाळासाहेबांचे झाले नाही ते राज साहेबांचे काय होणार, अशी टीका करत राजू पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विधानभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे आज बहुतांश उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडी आणि मनसेनेही मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यातच माहीम विधानसभेवरून मात्र मनसे आणि शिंदे गटातील वाद टोकाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हेही वाचा:Akola Constituency: प्रकाश आंबेडकरांचा डाव फसला? अकोल्यातून वंचितच्या उमेदवाराची माघार
माहीम मतदारंसघात मनसेने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. सुरूवातील सदा सरवणकर माहीममधून माघार घेतील अशी शक्यता होती. पण त्यांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळेच राजू पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीकास्त्र डागले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतील बिनशर्त पाठिंबा दिला होता. इतकचं नव्हे तर राजू पाटील यांनीदेखील त्यावेळी श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे स्वत: राज ठाकरे यांनीदेखील मतदारसंघात सभा घेऊन शिंदेचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्याची परतफेड म्हणून शिंदे गट विधानसभेला कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवार देणार नाही, अशी चर्चाही सुरूवातीला झाली. पण शेवटी शिंदे गटाने राजेश मोरे यांची उमेदवारी कायम ठेवली. त्यावरून राजू पाटील यांनी शिंदे गटावर आगपाखड केली आहे.
हेही वाचा:5 महिन्यांत 200 टक्क्यांनी रिटर्न्स, अनेकांना मालामाल करणारी ‘ही’ कंपनी आहे तरी कोणती?
मी माझ्या सहकाऱ्यांना आधीच म्हटलं होतं. कल्याण ग्रामीणमध्ये आपल्या विरोधात उमेदवार येणार आहे. मला या बाप-बेट्याची दानत माहिती आहे. जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत ते राज साहेबांचे काय होणार,मला इथल्या लोकांचं राजकारण माहिती आहे. मला गेल्या पाच वर्षांत या लोकांनी जो त्रास दिला, किंवा मी त्यांना क्रॉस केलंलं आहे. तो वचपा काढण्यासाठी, सुडाची भावना ठेवून ते आपल्या विरोधात उमेदवार देणार, हे मला माहिती होतं.