Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे, यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब, पिकांचे नुकसान झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2025 | 05:41 PM
Maharashtra Politics: "शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास..."; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Maharashtra Politics: "शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास..."; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास गाठ आमच्याशी- राजू शेट्टी
सरकारने घेतला जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय
कर्जमाफी करण्यासाठी उच्च स्त्रीय समिती स्थापन

सांगली: नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर शासनाने एक उच्च अधिकार समिती गठित करून जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यामध्ये कोणतीही मर्यादा न घालता, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास गाठ आमच्याशी असेल असा इशारा माझी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राजू शेट्टी म्हणाले, ” चालू वर्षे ३० हजार कोटी थकबाकी आहे, मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झालेल्या चर्चेत थकीत असणारे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली, यासाठी उच्चस्थरिय समिती स्थापन केलीं आहे, जो निवळ शेतकरी आहे, त्याचे कर्ज सरसकट माफ करा, अशीच आमची मागणी आहे, मात्र यापूर्वी प्रमाणे कर्ज मर्यादा घालू नयेत, राज्यात दर दोन तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहेत, शेत मालाला भाव नाही, मोठ्या प्रमाणात शेती पडीक होत आहे, याला सरकार जबाबदार आहे. ”

फळ बागांसाठी वेगळा निकष असावा

माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे, यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब, पिकांचे नुकसान झाले आहे, अनेक ठिकाणी मदत मिळाली , मात्र ही मदत शेतकऱ्यांना पुरेशी नाही, एकरी अडीच ते तीन लाख केवळ उत्पादन खर्च आहे, केवळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून २४०० कोटी शेतकऱ्यांचे कर्ज आहे, ते माफ करायला जून २०२६ उजडणार आहे, तो पर्यंत शेतकऱ्यांना जाच नको, शिवाय सीबील खराब नको, आशा मागण्या आम्ही करणार आहोत.सरसकट कर्ज माफी, देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळावा, निवडणूकीत भाजपने आश्वासन दिले आहे. असेही ते म्हणाले.

Viral Video: महाराष्ट्राच्या रस्त्यावर शेतकरी उडवू लागले 50-100 च्या नोटा; नक्की झालं तरी काय?

सांगली जिल्ह्यात शेतकरी मेळावा
सांगली,सह सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात द्राक्षे बागांचे नुकसान आणि इतर पिकांचे नुकसान, अभ्यासक, शेतकरी चळवळीतील संघटना, याची चर्चा सत्र घेतो आहोत. या चर्चा सत्राला अजित नवले, बच्चू कडू, वामनराव चटक असे शेतकरी नेते, शेतकरी अभ्यासक , अर्थतज्ञ उपस्थित राहणार असून शेतकरी प्रश्नांचे चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार असल्याचे राजू शेट्टी व संजय काका यांनी सांगितले.

Web Title: Raju shetti warn to maharashtra government loan waiver before june 2026 sangli news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Farmers
  • Maharashtra Government
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
1

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?
2

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान
3

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Farmers News: …म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट, नादुरुस्त कालव्यामुळे रब्बी पेरणी लांबली
4

Farmers News: …म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट, नादुरुस्त कालव्यामुळे रब्बी पेरणी लांबली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.