Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वबळावर लढून ते कोणाला मदत करू इच्छितात?’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना थेट सवाल

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  विधानसभेला कोणाशीही युती करण्याच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मनसे 225 ते 250 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 26, 2024 | 02:00 PM
‘स्वबळावर लढून ते कोणाला मदत करू इच्छितात?’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.  मनसे नेत्यांनी कल्याण डोंबिवली मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाचा प्रचारही केला. पण महाराष्ट्रात महायुतीचा मोठा पराभव झाला. देशातही भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  विधानसभेला कोणाशीही युती करण्याच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मनसे 225 ते 250 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

“225 ते 250 जागा लढवून ते कोणाला मदत करू इच्छितात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच,  ते मोदीजी किंवा अमित शाहांना मदत करू इच्छितात जे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, अशा शक्ती महाराष्ट्रात आहेत जे दाखवतात एक आणि करतात दुसरेच.  ते त्यांच्या पक्षाचे मालक आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आमची ही लढाई सुरूच राहिल आणि जोपर्यंत महाराष्ट्रात आमची सत्ता येत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहिल.

संजय राऊत म्हणाले, “लोक बोलतात एक आणि करतात दुसरेच. राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. ते बराच वेळ परदेशात होते, त्यामुळे राज्यात काय चाललयं हे जाणून घ्यायला त्यांना वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शाहाजी यांना बिनश’र्ट’ पाठिंबा दिला. म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला असे उद्धवजींनी सांगितले होते. म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला होता. जणूकाही महाराष्ट्रावर फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शाहांचा जन्म झाला आहे, असा सणसणीत टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

‘ज्या मोदी शाहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असे ते म्हणाले होते त्यांनाच बिनशर्त पाठिंबा दिला यातच सर्वकाही आलं. आता एका महिन्यातच त्यांची भूमिका कशी बदलते. 288 का 232 ज्या काही जागा ते लढणार आहे. हे आश्चर्यकारक आहे. ही त्यांची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठी जे    महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ती पावले उचचली जात आहेत का हे पाहावे लागेल. पण यावर फार काही बोलण्यात अर्थ नाही.काही पक्ष काही संघटना काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी निर्माण झाले आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांमुळे राजकारण अत्यंत खालच्या थराला गेले आहे असे तुम्ही म्हणालात, यावर बोलताना राऊत म्हणाले, हे मीच नाही संपूर्ण देशातील जनताच म्हणत आहे. मोदीजी पंतप्रधान झाले म्हणजे असे नाही की निवडणूक जिंकून पंतप्रधान झाले, मोदीजी आणि त्यांचा पक्ष निवडणूक हरले आहेत. हा एनडीएचा फंडा नंतर आला तो आधी नव्हता, मोदीजी अल्पमतात आल्यानंतर त्यांनी एनडीएचे भजन सुरू केले. त्यामुळे आता तुम्हीही स्वीकारा की मोदीजी निवडणूक हरले आहेत. तुम्ही पाहिले असेल मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना खंडणी देऊन त्यांनी आपली खुर्ची वाचवली आहे. अर्थसंकल्पात ज्या प्रकारे त्या दोघांना पैसा दिला गेलाय तो खूर्ची वाचवण्यासाठी दिला गेला आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.

Web Title: Sanjay raut criticize mns on fighting 225 250 vidhansabha seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 02:00 PM

Topics:  

  • raj thackeray
  • sanjay raut
  • Vidhansabha Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका
1

Maharashtra Politics : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका

Parth Pawar Raj Thackeray Meet : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात
2

Parth Pawar Raj Thackeray Meet : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात

Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ
3

Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.