
फोटो सौजन्य सोशल मीडिया
Satara : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे दादी प्रकाशमणीजी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ “१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महासंकल्प अभियान” राबविण्यात येणार आहे. ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण देशभर हे विशेष अभियान आयोजित करण्यात येत असून, विकसित, निरोगी आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
व्यसनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, कौटुंबिक तणाव वाढतो, आर्थिक नुकसान होते आणि युवकांचे भविष्य धोक्यात येते. या पार्श्वभूमीवर राजयोग ध्यान ही आत्मनियंत्रण, मानसिक स्थैर्य आणि दृढ इच्छाशक्ती निर्माण करणारी प्रभावी जीवनशैली असल्याचे डॉ. बनारसी शहा, अध्यक्ष, मेडिकल प्रभाग, माऊंट आबू यांनी नमूद केले आहे.
kolhapur : जळालं होतं, पण स्वप्न जळलं नाही ! केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिले
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्रातील सेवाकेंद्र एकवटेल असून राज्यातील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रातून विविध प्रकारच्या संस्था, महाविद्यालये, शाळा , विविध माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती होणार असल्याची माहिती डॉ. सोमनाथ वडनेरे, राज्य माध्यम समन्वयक, ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी दिली.
अभियानात प्रत्येक नागरिकाने ऑनलाइन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करावी तसेच किमान ५० नागरिकांपर्यंत हा संकल्प पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राजयोग ध्यानाचा नियमित सराव, सकारात्मक विचार, आत्मसंवाद, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सत्संग यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा दिली जाणार असल्याचेयांनी सांगीतले.
दरम्यान वडूज केंद्राच्या वतीने वडूज पोलीस स्टेशन, शिवाजी जूनियर कॉलेज आणि हायस्कूल, हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेज व हायस्कूल ट्रिनिटी स्कूल, कातर खटाव हायस्कूल एनकुळ कॉलेज व हायस्कूल, बनपुरी हायस्कूल व प्राथमिक, पळशी हायस्कूल व प्राथमिक, गोपुज हायस्कूल व प्राथमिक, गुरसाळे जूनियर कॉलेज व हायस्कूल, ग्रीन पावर शुगर्स लिमिटेड गोपुज, तडवळे हायस्कूल, केंब्रिज हायस्कूल जय मल्हार अकॅडमी, अचीवर करियर फाउंडेशन अकॅडमी, द्रोणाचार्य अकॅडमी, टॉपर अकॅडमी इत्यादी नशा मुक्त भारत महा अभियान अंतर्गत 25 प्रोग्राम आत्तापर्यंत घेण्यात आले यापुढेही 20 ऑगस्ट पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.
ब्रह्माकुमारीज मेडिकल विंगने सर्व शैक्षणिक संस्था, उद्योग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे तसेच सर्व नागरिकांना या राष्ट्रीय जनआंदोलनात सहभागी होऊन व्यसनमुक्त, निरोगी, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन स्थानिक सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी राणीदीदी यांनी केले आहे.