
माती परीक्षणातून जमिनीचे आरोग्य मूल्यांकन! २७ हजारांवर शेतकऱ्यांचा सहभाग; मृदा कार्डाचे होणार वितरण
रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतजमिनीचा पोत बिघडत असून, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जमिनीचे आरोग्य समजण्यासाठी शासनाकडून माती परीक्षण योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. या उपक्रमांतर्गत २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यातील तब्बल २७ हजार ६९५ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे मृदा परीक्षण करून घेतले आहे. कृषी विभागाच्या जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालयामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येते. शेतकऱ्यांकडून मातीचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. या तपासणी अहवालातून जमिनीचे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म स्पष्ट होतात.(फोटो सौजन्य – AI)
कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना
जमिनीच्या प्रकारानुसार (भारी, मध्यम व हलकी) खतांचे प्रमाण निश्चित करण्यास या अहवालाची मदत होते. माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांची माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य उपाययोजना करून जमिनीचा पोत सुधारता येतो. यामुळे उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होते. जिल्ह्यात १६ तालुक्यांमधील २६ हजार ९३ शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले असून, याशिवाय ११३९ शेतकऱ्यांनी फळबागांसाठी ४६१ जणांनी सामान्य माती नमुन्यांसाठी, ८ पाणी नमुन्यांसाठी तर २ नमुने सूक्ष्म परीक्षणासाठी तपासणीसाठी दिले आहेत. एकूण मिळून २७ हजार ६९५ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.माती परीक्षणानंतर शेतकऱ्यांना मृदा कार्ड देण्यात येते. या कार्डमध्ये जमिनीचे आरोग्य व आवश्यक खतांची माहिती दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन करता येते. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच पीक उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होत आहे.
बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका
66 कृषी विभागाच्या जिल्हा मृदा व सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालयातून राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविली जाते. शेतकऱ्यांकडून मातीचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. जमिनीचा पोत कळावा, यासाठी माती परीक्षण केले आहे. आता टप्याटप्याने शेतकऱ्यांना मृदा कार्डचे वितरण करण्यात येत आहे, असे मत – मनोजकुमार ढगे, अधीक्षक, कृषी अधिकारी, यवतमाळ तालुका तपासणी यांनी व्यक्त केले आहे.