Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याची स्वतंत्र नवीन विद्युत योजना; सौरऊर्जेच्या अधिकाधिक वापरावर दिला जाणार भर

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ला पूरक अशी स्वतंत्र योजना महाराष्ट्र सरकार आणणार आहे. तसेच, राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 11, 2025 | 07:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र शासनाने ० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना घराच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसविण्याची सुविधा दिली जात आहे, ज्यामुळे घरगुती विजेचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल. या केंद्र शासनाच्या योजनेला सहाय्यभूत ठरेल अशी स्वतंत्र योजना महाराष्ट्र शासन आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

नेरळ येथील शिवसेना शाखा कार्यालय येथील रस्ता वाहतुकीस कधी होणार खुला?

वीज दरवाढीबाबत सदस्य मुरजी पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यातील विजेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) पुढील पाच वर्षांसाठी बहुवार्षिक वीजदर याचिका (मल्टीइयर टॅरिफ पिटीशन) सादर करण्यात आली आहे. या याचिकेनुसार २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीत दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा प्रस्ताव आहे. देशभरातील वीज नियामक आयोगांपैकी अशा प्रकारची याचिका सादर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई शहरासाठीदेखील वीज दर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, बेस्ट, टाटा पॉवर, अदाणी आणि महावितरण या वीज वितरण कंपन्यांनीही वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक वीजदर याचिका सादर केली आहे. याशिवाय, मुंबईतील मोठ्या इमारतींमध्ये पारंपरिक तसेच अपारंपरिक पद्धतीने वीज उपलब्ध करण्याच्या दिशेने शासन नव्या योजनांचा विचार करत आहे. ज्या इमारतींमध्ये अतिरिक्त वीज निर्मिती क्षमता आहे, त्या इमारतींसाठी वेगळ्या धोरणावर विचार केला जात आहे.

Devendra Fadnavis: “… ते पुढच्या काळात दिसून येईल”; मशिदीवरील भोंग्यांबाबत फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

विजेचे दर निश्चित करण्याचा अंतिम अधिकार वीज नियामक आयोगाकडे असून, शासनाने पुढील पाच वर्षांसाठीच्या दरांची याचिका आयोगासमोर सादर केली आहे. सर्व नियामक प्रक्रियेनंतर आयोग २०२५-३० या कालावधीसाठी अंतिम वीजदर जाहीर करेल. त्यानंतर वीज वितरण कंपन्या नव्या दरानुसार आकारणी करतील. राज्य शासनाच्या नव्या योजनांमुळे वीज दर नियंत्रणात राहतील, सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर होईल आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्माणीस चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Web Title: States new independent power plan to increased use of solar energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • electricity
  • maharashtra news
  • Mahavitaran Department

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
2

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण
3

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
4

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.