Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: कोल्हापूरला अवकाळी पावसाने सहा तास झोडपले; नागरिकांची उडाली तारांबळ

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाने तुफान हजेरी लावली आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 27, 2025 | 05:29 PM
Storm arrives in Kolhapur on return journey of rain orange alert for Kolhapur monsoon news update

Storm arrives in Kolhapur on return journey of rain orange alert for Kolhapur monsoon news update

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Monsoon Alert: कोल्हापूर : राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन आठवड्यापूर्वी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची ही जखम भरण्यापूर्वीच पुन्हा एकदा वरुणराजाचे आगमन झाले आहे. राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर कोल्हापूरमध्येही तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये सलग सहा तास पाऊस झाल्यामुळे सामान्य लोकांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे.

गेले दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून ऑक्टोबर महिनाअखेरीस परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. सतत पडणाऱ्या या पावसामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. मान्सूनचा परतीच्या पावसाने मागील पंधरा दिवसापासून सुरुवात केली आहे. एक दोन दिवसांनी अधून मधून काही अंशी पाऊस पडत होता. मात्र सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आकाशात काळे कुठ ढग अचानक जमा होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग सहा तास पावसाने चांगलेच झोडपून काढले त्यामुळे व्यापारी वर्गाची तसेच नागरिकांची चांगलीच तारांबळा उडाली .

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संपूर्ण जिल्ह्यात पावसाने झोडपून काढल्याने काढणीसाठी आलेले भात, भुईमूग, ज्वारी ,नाचणी, उडीद आदी पिकावर पावसाचे सावट पडले आहे. तर हंगामी ऊस लागणीची कामे खोळंबून पडली आहेत. यंदाचा ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याने ऊस तोडणी मजूर परिसरात दाखल झाले आहेत. मात्र या पावसामुळे ऊस तोडणीवरही परिणाम झाला आहे. आणखीन दोन दिवस हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असल्याने पाऊस वाढण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने नदीची पाणीपातळी सुद्धा वाढली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राज्यावर पावसाचे भीषण संकट

राज्यात वादळी वारे, विजा आणि अवेळी पावसामुळे जीवनमान प्रभावित होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावरील हे कमी दाबाचे क्षेत्र मागील काही तासांत नैऋत्येकडे सरकले असून सध्या ते मुंबईपासून सुमारे ७६० किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे २६ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार असल्याचे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले.

येणाऱ्या काळात कोकण व मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. मराठवाडा भागात २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मच्छीमारांसाठी चेतावणी

समुद्राला उधाण असल्याने पूर्व मध्य आणि आग्नेय अरबी समुद्र तसेच लक्षद्वीप, कोमोरिन क्षेत्र, कर्नाटक व केरळ किनारपट्टीवर २७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात उधाण ते तीव्र उधाण अशी स्थिती राहण्याचा अंदाज आहे. ईशान्य अरबी समुद्र, महाराष्ट्र-गोवा व गुजरात किनारपट्टीवर २६-२७ ऑक्टोबर दरम्यान वादळी वारे ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. म्हणून मच्छीमारांना पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

Web Title: Storm arrives in kolhapur on return journey of rain orange alert for kolhapur monsoon news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

पंढरपूर तालुक्यात ऑक्टोबर छाटणीची धांदल सुरु; दहा ते पंधरा वर्षात द्राक्ष बागांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ
1

पंढरपूर तालुक्यात ऑक्टोबर छाटणीची धांदल सुरु; दहा ते पंधरा वर्षात द्राक्ष बागांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ

मान्सून संपला तरीही पाऊस सुरु; भात पिकाला वादळी पावसाचा मोठा धोका
2

मान्सून संपला तरीही पाऊस सुरु; भात पिकाला वादळी पावसाचा मोठा धोका

सलग सुट्ट्यांमुळे पन्हाळा हाऊसफुल्ल; नगरपरिषदेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ
3

सलग सुट्ट्यांमुळे पन्हाळा हाऊसफुल्ल; नगरपरिषदेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ

Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी
4

Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.