Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

Kolhapur News- तालुक्यातल्या दोन-तीन प्रमुख बाजारपेठा सोडल्या तर आजही अनेक भागांतील प्रमुख गावांमध्ये साधा आठवडी बाजार भरत नाही. आठवड्याच्या बाजारासाठीसुद्धा लोकांना बाजूच्या तालुक्यातील बाजारपेठांमध्ये जावे लागते.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 24, 2026 | 02:20 PM
Kolhapur News, Shahuwadi News, Udaysing Gaikwad, Cooperative Sugar Factory

Kolhapur News, Shahuwadi News, Udaysing Gaikwad, Cooperative Sugar Factory

Follow Us
Follow Us:
  • साखर कारखाना सोडला तर इथं म्हणावा तसा सहकारही उभा राहू शकलेला नाही
  • वन्य प्राण्यांचा वाढता धोकाही शाहुवाडीकरांच्या रोजच्या जगण्याचा भाग
  • आतापर्यंत गव्याच्या हल्ल्यांत एक शेतकरी, बिबट्याच्या हल्ल्यांत दोन लेकरं दगावली
सतीश नांगरे, Kolhapur News:  शाहुवाडी तालुका हा डोंगर-दऱ्यांमध्ये विखुरलेला, निसर्गसंपन्न पण विकासाच्या बाबतीत मात्र आजही दुर्लक्षित राहिलेला तालुका आहे. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र विकासाच्या सीमा या रस्ते, हॉल आणि गटर्स याच्यापुढे सरकतच नाहीत. पायाभूत सुविधा या महत्त्वाच्या आहेतच मात्र धोरणात्मक विकासावर बोलायला कोणीच तयार नाही.

उदयसिंग गायकवाड यांनी सुरू केलेला साखर कारखाना सोडला तर इथं म्हणावा तसा सहकारही उभा राहू शकलेला नाही. तरुणांच्या हाताला कामधंदा नाही. शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था तोकडी ठरत चालली आहे. प्रक्रिया उद्योग, पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती किंवा उद्योगधंदे याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. परिणामी या तालुक्यातल्या बेरोजगार युवकांचे लोंढेच्या लोंढे हे पुण्या-मुंबईसारख्या महानगरांकडे वळत आहेत. गावं ओस पडत आहेत आणि तरुण पिढी हळूहळू गावांपासून तुटत चालली आहे.

“मुंब्रा हिरवे करण्याचा उद्देश राजकीयच…”, किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर Sahar Sheikh यांचा माफीनामा

दुसरीकडे वन्य प्राण्यांचा वाढता धोकाही शाहुवाडीकरांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनला आहे. वाघ, बिबट्या, डुक्कर, गवे यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होत आहे. शेकडो एकर जमीन पिकांवाचून पडून आहे. रात्री तर सोडाच, दिवसा शेतात जाण्याचीही भीती वाटते. अनेक ठिकाणी या दहशतीमुळे वाड्या-वस्त्यांवरील मुलांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षणाचा प्रश्न इथे केवळ शैक्षणिक न राहता सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे.

गेल्याच महिन्यात गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेला एक शेतकरी आपला जीव वाचवण्यासाठी पोटातली आतडी हाताने सावरत पळत होता. नशीब बलवत्तर म्हणून तो कसाबसा वाचला. आतापर्यंत गव्याच्या हल्ल्यांत एक शेतकरी, बिबट्याच्या हल्ल्यांत दोन लेकरं दगावली आहेत. आम्ही आमची लेकरं-बाळं ही वन्य प्राण्यांच्या घशात घालण्यासाठी जन्माला घालतो आहोत का.? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित कुटुंबांना मदतीचे धनादेश दिले म्हणजे लोकप्रतिनिधींची जबाबदारी संपते का.? हा खरा प्रश्न आहे. शेतीच्या, लोकांच्या सुरक्षेचं काय.? यावर कोण बोलणार.?

तालुक्यातल्या दोन-तीन प्रमुख बाजारपेठा सोडल्या तर आजही अनेक भागांतील प्रमुख गावांमध्ये साधा आठवडी बाजार भरत नाही. आठवड्याच्या बाजारासाठीसुद्धा लोकांना बाजूच्या तालुक्यातील बाजारपेठांमध्ये जावे लागते. याला दुर्दैव म्हणावे का.? दुसरे काय.? दळणवळणाच्या सोयी-सुविधा वाढवाव्यात, आपल्या गावात, भागात मार्केट उभं राहावं. यासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही. दुर्दैवाने या तालुक्यात म्हणावी तशी व्यासायिक प्रशिक्षण देणाऱ्या शाळा, कॉलेजेस सुद्धा उभी राहिलेली नाहीत.

Chandrapur Congress Conflict: चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट… हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टचं सांगितलं

या निवडणुकीत रोजगार, आरोग्य, शिक्षण, बाजारपेठा, वन्य प्राण्यांपासून सुरक्षितता, बेरोजगार तरुणांचे इतरत्र होणारे स्थलांतर यावर बोलायला कोणीच तयार नाही.? दीर्घकालीन विकास आराखडा खरंतर कुणाकडेच दिसत नाही. मात्र इथल्या सर्वसामान्य जनतेतून ‘राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या जगण्याला केंद्रस्थानी ठेवणारा विकास होईल का.?’ हा भोळा-भाबडा प्रश्न विचारला जात आहे.

रस्ते, हॉल आणि गटर्स एवढाच विकास असतो का.?

विकास म्हणजे फक्त रस्ते, हॉल आणि गटर्स एवढाच असतो का.? रस्ते आवश्यक आहेत, पण रस्त्यांवर चालणारा माणूस बेरोजगार असेल, तर तो विकास कसला.? प्रश्न अनेक आहेत, पण त्यावर ठोस उत्तर देणाऱ्या नेतृत्वाचा मात्र अभाव प्रकर्षाने जाणवतो.

सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता

निवडणुकीला उभे रहायचे. निवडून आले की ठेकेदार निर्माण करायचे, पोसायचे. त्यातून पैसा कमवायचा आणि पैशातून पुन्हा सत्ता. आपण मतदानातून हेच चक्र सुरू राहणार असेल तर आपण निवडणुकीत नेमकं मतदान करतोय की राजकारणातल्या बदमाशीवर शिक्कामोर्तब करतोय. हे ही मतदार राजाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीला विचारायला पाहिजे.

 

 

Web Title: Kolhapur news the terror of wild animals and the migration of young people the reality of shahuvadis wounds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • Shahuwadi News

संबंधित बातम्या

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
1

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
3

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
4

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.