Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचला ; काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांची मागणी

गणेशोत्सव संपल्यानंतर नवरात्रीला सुरूवात झाली. नवरात्रीनंतर आता राज्यातील जनतेला दिवाळीचे (Diwali) वेध लागले आहेत. सणासुदीच्या या काळात मिठाईचा खप वाढतो. याचा फायदा उचलत भेसळखोर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीला सुरुवात करतात.

  • By Aparna
Updated On: Oct 09, 2022 | 07:22 PM
भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचला ; काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांची मागणी
Follow Us
Follow Us:

पुणे: गणेशोत्सव संपल्यानंतर नवरात्रीला सुरूवात झाली. नवरात्रीनंतर आता राज्यातील जनतेला दिवाळीचे (Diwali) वेध लागले आहेत. सणासुदीच्या या काळात मिठाईचा खप वाढतो. याचा फायदा उचलत भेसळखोर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीला सुरुवात करतात. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पत्रात म्हटले आहे की, मिठाई, दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे दुकानदार हे भेसळ करण्याची दाट शक्यता असते. अन्न पदार्थांमधील भेसळ ही अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे. सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी भेसळविरोधी पथकाची स्थापना केली जाऊ शकते. जेणेकरून ग्राहकांना चांगल्या दर्जाचे आणि भेसळविरहीत अन्नपदार्थ मिळू शकतील. तांबे यांनी लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, दसरा आणि दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या देशात या सणांसोबत मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थांचे नाते जोडले गेले आहे; किंबहुना हे अन्नपदार्थ आपल्या संस्कृतीचा एक भागच बनले आहेत.

भेसळीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने दुकाने आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच मिठाई बनवणाऱ्या कारखान्यांवर धाडी टाकल्या पाहिजेत. जर कोणी भेसळ करताना दोषी आढळला तर त्याच्याकडून सक्तीने दंड वसूल केला जावा आणि त्याचा परवाना रद्द केला जावा. सरकारने कारवाई व्यतिरिक्त सर्वसामान्य ग्राहकांमध्ये भेसळीविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे तांबे यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Take strict steps to prevent adulteration nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 07:15 PM

Topics:  

  • Diwali
  • maharashtra
  • Pune
  • Satyajeet Tambe

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
1

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
2

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
3

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
4

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.