Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळ प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक; आंदोलन मोडीत काढण्याचा शासनाचा डाव

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी अशा सात गावात शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, प्रकल्पासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2025 | 05:37 PM
पुरंदर विमानतळ प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक; आंदोलन मोडीत काढण्याचा शासनाचा डाव

पुरंदर विमानतळ प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक; आंदोलन मोडीत काढण्याचा शासनाचा डाव

Follow Us
Close
Follow Us:

सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी अशा सात गावात शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, प्रकल्पासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे तब्बल सात गावे कायमची विस्थापित होणार असल्याने शेतकरी कोणत्याही परिस्थितीत आपली जमीन देण्यास तयार नाहीत. यासाठी तब्बल आठ ते नऊ वर्षे शासनाच्या विरोधात लढा सुरु आहे. मात्र राजकीय शक्ती शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याने शेतकऱ्यांची दखल घेण्यास शासन तयार नाही. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प करायचाच याच हेतूने शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे. त्यातूनच लाठीहल्ला करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

तब्बल आठ वर्षे शेतकऱ्यांनी अत्यंत संयमाने शासनाच्या विरोधात लढा दिला असतानाही शासन मात्र शेतकऱ्यांचा लढा कोणत्याही परिस्थितीत मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. माजी आमदार संजय जगताप यांनी मागील पाच वर्षे शेतकऱ्यांच्या बाजूने लढा दिला. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी विमानतळ प्रकल्प करणारच अशी घोषणा केली आणि तिथूनच विमानतळ प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली. मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध सुरु केला, मात्र सरकार एक एक पाऊल पुढे टाकत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीपासून संदिग्ध भूमिका घेत केवळ शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही एवढेच सांगितले, मात्र शेतकऱ्यांमध्ये ठाम विश्वास दिला नसल्याने त्यांच्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास पूर्णपणे मोडून निघाला आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा विमानतळ विरोधात एकाकी लढा सुरु आहे. सुरुवातीला गावातील गाव पुढार्यांनी साथ दिली, मात्र त्यातील बहुतेक पुढारी हेच दलाल असल्याने शेकडो जमिनी त्यांनीच दलालीच्या हव्यासापायी गुंतवणूकदारांच्या घशात घातल्या. एकीकडे प्रकल्पाला विरोध म्हणून दाखवायचे आणि दुसरीकडे खरेदी विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरु ठेवून शेतकऱ्यांचा एक प्रकारे विश्वासघात केला आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या बाजूने कोणतीही मोठी ताकद उभी नाही. राजकीय पाठबळ केव्हाच संपले असून, गाव पुढारी दलाल झाले आहेत. तर जेवढे क्षेत्र गावोगावचे विकले गेले ते बाहेरच्या लोकांना दिल्याने त्यांचा पाठींबा मिळणे शक्यच नाही. उर्वरित शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती असून राजकीय लोभापायी अनेक राजकीय शेतकरी आंदोलनापासून अलिप्त आहेत, कित्येक घरांमध्ये प्रशासकीय पदावर तसेच विविध व्यवसाय निमित्त तरुण असल्याने अशी कुटुंबेही अलिप्त आहेत. सात गावातील अनेक गावात शिवसेनेची ग्रामपंचायत असल्याने त्यांची भूमिका केवळ दाखविण्यापुर्तीच ठरली आहे. त्यामुळे केवळ ४० ते ५० टक्के लोकांच्या जीवावरच कित्येक दिवस आंदोलन उभे आहे. आणि हि परिस्थिती राजकीय दलालांनी प्रशासनाला पटवून दिल्यानेच शासनाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा एकाकी लढा किती दिवस चालणार हाच मुख्य प्रश्न आहे.

Web Title: Tension has arisen as farmers oppose land for purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Action on Police
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Purandar Airport
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
2

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
3

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
4

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.