होळी सणाला गालबोट! धुळवडीचा रंग काढायला गेलेल्या चौघांचा बदलापुरात नदीत बुडून मृत्यू
देशभरासह राज्यात होळीचा सण साजरा केला जात आहे. दरम्यान आज धुळवड साजरी केली जात असताना बदलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे . बदलापुरातील चार मुलांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने चौघंही बुडाल्याचं सांगिंतलं जात आहे. आर्यन मेदर(१५), आर्यन सिंग (१६), सिद्धार्थ सिंग (१६), ओमसिंग तोमर (१५) अशी मृत मुलांची नावं असून हळहळ व्यक्त होत आहे.
बदलापुरात धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या मुलांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे. बदलापूरच्या चामटोली परिसरात राहणारे चौघे मुले होते. चारही मुले चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे होते. चौघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बदलापूरच्या चामटोली भागात राहणाऱ्या चौघांनी धुळवड खेळली. धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीजवळ पोहोचले. उल्हास नदीत चौघे अल्पवयीन मुले उतरली होती . या चौघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चौघंही पाण्यात बुडाली. मुलांच्या मृत्यूने चामटोली परिसरात खळबळ उडाली आहे.
मुलं पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. चौघांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. चौघांच्या मृत्यूने धुळवड सणाला गालबोट लागलं आहे.