Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार

खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी १० भरारी पथके तयार केली आहेत. या माध्यमातून विक्रेत्यांची सखोल तपासणी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2025 | 06:31 PM
वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना योग्य बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत उपलब्ध व्हावीत, त्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने चांगलीच कंबर कसली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने १० भरारी पथके तयार केली आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी कृषी विभागाने १० भरारी पथके तयार केली असून, या माध्यमातून विक्रेत्यांची सखोल तपासणी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात कृषी भरारी पथकाने कारवाई केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर परवाना रद्द करून दुकान बंद होईल, असा थेट इशारा देखील कृषी विभागाने दिला आहे.

शेती अभियान मोहीम १२ जूनपर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, सेंद्रिय उत्पादन, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण आणि विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, नाचण्या, मका, उडीद, मूग ,चवळी आदी बियाणे सवलतीच्या दरात ग्रामपंचायतीच्या मार्फत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्याकडून २९ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत उपलब्ध अर्ज मागणीनुसार बियाणांचा पुरवठा केला जाणार आहे.

बनावट माल विक्री केल्यास कारवाई

खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा बनावट माल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला असून, कृषी भरारी पथकाकडून नमुने गोळा करणे, तपासणी अहवाल तयार करणे आणि तत्काळ कारवाई करणे अशी कामगिरी केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना सढळ मदत होत असून, बोगस माल विक्रेत्यांचे थेट परवाने रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे कायदेशीर कारवाईला गती मिळाली आहे.

खत खरेदीसाठी जबरदस्ती करू नये

अनुदानित रासायनिक खतांची विक्री करताना खते खरेदीसाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करू नये, असे निर्देश परवानाधारकांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदी करावे. दुकानदारांकडून पावती घ्यावी. शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार असेल तर तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

Web Title: The agriculture department will take action against shopkeepers if they cheat farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Agriculture News
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Farmers
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
1

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
2

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
3

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
4

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.