
राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी
राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. १ मार्चपासून आजतागायत राज्यात उष्माघाताचे एकूण १५ रुग्ण आढळले असून, गेल्या २४ तासांत गडचिरोली आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. अकोल्यात रिक्षाचालकाचा तर वाशिकमध्येही एकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य माहितीनुसार, १ मार्च ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे सावट पाहायला मिळत आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ६ रुग्ण आढळले असून, पालघरमध्ये २. तर जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, जालना आणि गडचिरोली या जिल्ह्यांत प्रत्येकी १ रुग्ण नोंदवण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – istock)
विदर्भातील बाराही जिल्ह्यांमध्ये ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे पारा पोहोचला आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये ४३.१ अंश सेल्सिअस तापमान होते.राज्यातील सुमारे २३ जिल्ह्यांमध्ये बुधवारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र विभागातील जळगावमध्ये, जेऊरमध्ये ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तर मालेगावचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांचा पारा ४० च्या पुढे असून, पश्चिम महाराष्ट्रात ४४ अमरावती सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची ४४ वर्धा नोंद झाली. तर साताऱ्यात ४०.९ अन् सांगलीत ४१.८ अंश
४३.९ सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकण पट्ट्यात तापमानाचा पारा चढता असल्याने नागरिकांनी हायड्रेटेड राहणे आणि उन्हापासून बचाव करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञानी म्हटले आहे. उष्मताघाताच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.