देवनार कत्तलखान्यातून मांस का खरेदी केले जात नाही? राणीबागेतील वाघांना निकृष्ट दर्जाचे मांस
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आहारासाठी एवढे मोठे कोटींचे कंत्राट देऊनही वाघ कुपोषित असल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका तुलिप मिरांडा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे. तसेच मांसाहारी प्राण्यांना देण्यात येणाऱ्या मांसाची तपासणी केली जात नाही आणि त्यांना योग्य प्रमाणात मांस पुरवले जात नसल्याने ते कुपोषित आहेत का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.(फोटो सौजन्य – istock)
IIT Bombay येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा; आशिष शेलार
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसमोर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आहारासाठी आवश्यक मांस पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा कंत्राटदार बाहेरचा असून आपण देवनार कत्तलखाना येथून का मास खरेदी करत नाही. तसेच या कंत्राटदारचे कंत्राट एक वर्षांचे न ठेवता पाच वर्षाचे का केले जात नाही, असा सवाल मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव यांनी उपस्थित केला.
८८ राणी बागेतील बिबट्या, वाघ, तसर या प्राण्यांना मांस देण्याचे कंत्राट एका वर्षासाठी देण्यात येणार आहे. पण हे कंत्राट पाच वर्षांसाठी देण्यात यावेत, अशी माहिती नगसेविका यामिनी जाधव यांनी दिली आहे. सध्या येथे सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी मोठ्या संख्येने असून त्यांना दररोज मोठ्या प्रमाणावर खाद्यपुरवठा करावा लागतो. विशेषतः वाच, बिबट्या, तरस आणि कोल्हा यासारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी ताजे मांस पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अनुभवी कंत्राटदाराकडून हा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, सातत्याने तीन वेळा निविदा मागवूनही प्रतिसाद मर्यादित मिळाल्यानंतर अखेर नियमानुसार पात्र कंत्राटदार मेसर्स एवरन्यू ट्रेडर्स यांच्याबरोबर एकूण रु. ६१,७७,७००/- चा कंत्राट करार करण्यात आला, मात्र या करारावर काँग्रेस नगरसेविका तुलिप मिरांडा यांनी आक्षेप घेतला आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उद्यानाचा मास्टर लेआउट आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार विविध प्राण्यांच्या प्रदर्शनांची कामे पूर्ण झाली आहेत. या राणीबाग प्राणी संग्रहालयामध्ये माकडांचा पिंजरा मोठा आहे, पण त्यामध्ये फक्त केवळ एकच माकड आहे. त्यामुळे माकडाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी, अशी मागणीही मिरांडा यांनी केली.






