महावीर उद्यान हे एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याचे केंद्र आहे. मात्र सध्या येथे अस्वच्छता, तुटलेली साधने आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेने तात्काळ लक्ष न दिल्यास आम्ही आंदोलन छेडू.
– महेश खराडे, बापट मळा कृती समिती
सुरक्षित व सुस्थितीत उद्याने नागरी हक
शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुस्थितीत सार्वजनिक उद्याने मिळणे हा मूलभूत नागरी हक्क मानला जातो. कराच्या स्वरूपात नागरिकांकडून निधी जमा होत असताना अशा सुविधांची योग्य देखभाल करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शहरातील उद्याने ही केवळ फिरण्यासाठीची ठिकाणे नसून ती नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावी केंद्रे असतात. महावीर उद्यानासारखी ठिकाणे शहराच्या जीवनमानात मोठा वाटा उचलतात. या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ दुरुस्ती व स्वच्छतेची मागणी केली आहे.
अंधार, असुरक्षिततेचे सावट असल्याने भीती
बापट मळा येथील महावीर उद्यानात रात्रीच्या वेळी अपूर्ण प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात जात आहे. या अंधाराचा गैरफायदा घेत उद्यानातील काही छुप्या ठिकाणी युगुलांचे अश्लील प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच उद्यानाबाहेरील व आतील अंधाऱ्या भागात नशेड्या युवकांचा वावर वाढल्याचे चित्र असून, काही ठिकाणी खुलेआम व्यसन करताना युवक दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तात्काळ प्रकाशयोजना व पोलीस वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.






