सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्य परिसरातील शिराळा तालुक्यासह लगतच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीतील विश्रामबाग परिसरात असणारी खोकी अतिक्रमण ठरवत बेकादेशीरपणे जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकल्याचा आरोप करत केला जात आहे.
महाराष्ट्रामध्ये मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही एकच घेण्यात यावी या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असतानाही शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
कारखान्याच्या डिस्टलरीतून रसायन मिश्रित 'स्पेन्ट वॉश' पाणी थेट कृष्णा नदीपात्रात सोडण्यात आल्याने बोरगाव ते जुनेखेड या तब्बल २० किलोमीटर परिसरात लाखो मासे मृत झाले आहेत.
सरकारच्या या महामार्ग प्रकल्पावर शेतकऱ्यांकडून कायमच तीव्र विरोध केला आहे. अशातच आता शक्तिपीठ महामार्गासाठी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांची एक इंचही जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार बळीराजाने केला आहे.
शिवरायांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रशासनातील शिस्त, लोककल्याणाची भूमिका आणि दूरदृष्टी आजच्या पिढीने अंगीकारणे गरजेच आहे, असे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी सांगितले.
महाशिवरात्रीनिमित्त मासाळवाडी येथे भव्य महावैष्णव मेळावा भक्तिभावात पार पडला. १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या मेळाव्यात विविध ठिकाणांहून साधक-भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
संपूर्ण जगभरामध्ये आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असतानाच सांगलीमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी झाली.
ही दोन दिवसीय नाट्यमेळा सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत साने गुरुजी नाट्यगृह येथे रंगणार आहे. सामाजिक आशय मांडणाऱ्या एकांकिकांपासून ते निखळ मनोरंजन देणाऱ्या प्रयोगांपर्यंत विविधतेचा संगम रसिकांना अनुभवता…
शेतकरी हा केवळ आश्वासनांवर शेती करू शकत नाही. शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भारतीय किसान संघाच्या वतीने देण्यात आला.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
द्राक्षांच्या चव आणि गुणक्त्तेसाठी जगप्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चर्चेत आला आहे. वायफळे ता. तासगाव येथील प्रगतशील शेतकरी राहुल पाटील यांच्या द्राक्षांना परदेशात मागणी मिळाली आहे.
शिराळा येथील बिउरमध्ये सहा वर्षीय बालक राजवीर हनुमंत पाटील याचा बळी घेतल्यानंतर वन विभाग नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शूटिंग बॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी माळशिरस येथे झालेल्या निवड चाचणी मध्ये सांगलीतील प्राजक्ता संजय आवळे या मुलीची वर्ल्ड कप साठीच्या भारतीय शूटिंग बॉल संघात निवड झाली.