Sangli Crime Accused Sentenced To Death: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे सव्वा चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी याला जिल्हा व सत्र न्यायालयाने…
सध्या उपलब्ध असलेले अतिरिक्त पाणी ताकारी, म्हैशाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांद्वारे उचलून खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, मिरज पूर्व भाग तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील तलाव तातडीने भरावेत, अशी…
याशिवाय गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. अशाप्रकारे एकूण ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतीमध्ये झालेली दरवाढ आणि निर्माण झालेला तुटवडा याच्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत तीव्र निदर्शने करण्यात आली.
Sangli जिल्ह्यात ‘Tree Army’च्या माध्यमातून अनोखी हरित क्रांती उभी राहत असून, पिंपळाच्या झाडांच्या पुनर्वसनातून ही चळवळ आता मोठ्या लोकआंदोलनात बदलली आहे.
मिरज ग्रामीण पोलिसांनी लिंगनूर पारधी वस्ती येथे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवून गंभीर गुन्ह्यांतील तीन फरारी आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तासगाव तालुक्यात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसासह झालेल्या तीव गारपीटीने शेतीला मोठा फटका बसला असून द्राक्ष, आंबा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वाढत्या अडचणींची दखल घेत आमदार रोहित पाटील यांनी सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी तालुक्यातील सावळज, वायफळे व चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट…
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात मोठी खळबळ उडाली आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेवर गंभीर आरोप करत तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी एकत्रित राजीनामे दिले आहेत.
शहर जिल्हाच्या वतीने भव्य महिला पदयात्रा उत्साहात पार पडली. भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वाती खाडे, सुमन ताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.
पाच महिन्यापासून नळाला पाणी नाही तर नगरसेवक फिरकत नाही या शीर्षकाखाली दोन दिवसांपूर्वी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आवाज उठवण्यात आला.
शिक्षण संचालक स्तरावर नामंजूर झालेली थकीत बिले तात्काळ मंजूर करावीत, तसेच निष्काळजीपणे बिले नामंजूर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्याथ्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि सार्वजनिक हालचालींना अडथळे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आपल्या लेखणीच्या माध्यमातून हजारो कथा कादंबऱ्या गाणी चित्रपट कथा लिहिणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याची जागा महापालिकेकडे वर्ग करा, असं प्रशासनाला साकडं घालण्यात येत आहे.
आखातीयुद्धांच्या परिणामामुळे गॅस पुरवठा कमी होत असल्याने सांगली शहरातील सर्वच एलपीजी पंप सध्या बंद झाले असून याचा दुष्परिणाम एलपीजी रिक्षा चालकांच्या रोजी रोटी वर होत आहे.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये काही भागात सध्या पाण्याची टंचाई भासत असून, याकडे महापालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.