Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात ऊस बिलातून एक छदामही कपात करु देणार नाही, अशी परखड भुमिका रयत क्रांती संघटनेने घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2025 | 03:06 PM
रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे अशातच सरकारने ऊसबील कपातीचा निर्णय घेतल्यामुळे सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलांमधून कपात होणारी रक्कम वाढली असून, प्रतिटन २७ रुपये ५० पैसे कपात होणार आहेत परंतु चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात एक छदामही कपात करु देणार नाही, अशी परखड भुमिका रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी घेतली आहे. या कपातीमुळे  कोल्हापूर विभागात ५५ कोटी, तर राज्यातून ३३० कोटींचा बोजा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अडचणी निर्माण होणार आहेत, असंही बिडवे म्हणाले.

उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात याप्रमाणे प्रतिटन १५ रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळपसंदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेतला. ऊस गाळप हंगामात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आजवर शेतकऱ्यांकडून प्रतिटन पाच रुपये कपात केली जात होती, मात्र यंदा अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यात तीनपट वाढ करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे, असं बिडवे म्हणाले.

अशी होणार कपात

मुख्यमंत्री सहाय्यता निधी — प्रतिटन १० रुपये

पूरग्रस्त निधी – ५ रुपये

गोपीनाथ मुंडे महामंडळ- १० रुपये

साखर संघ निधी-१ रुपया

व्हीएसआय निधी – १ रुपया

साखर आयुक्त कार्यालय – ५० पैसे

एकूण कपात- २७.५० पैसे

कपातीत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर विभागात, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दोन कोटी दोन लाख टन ऊस गाळप होतो, तर राज्यात सुमारे १२ कोटी टन ऊस गाळप होईल, अशी स्थिती आहे. नवऱ्याने मारले अन् पावसाने झोडपले दाद मागायची कुणाकडे अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली असताना सरकारचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे. अतिवृष्टी, महापुराने सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचेच झाले आहे. कारखाने एफआरपी म्हणून शेतकऱ्यांना आधीच उसाचा कमीत कमी दर देतात. खर्च जादा आणि उत्पन्न कमी यामुळे ऊस शेती तोट्यात आणि शेतकरी कर्जात बुडालेला आहे. त्यात ही प्रतिटन २७ रुपये ५० पैसे होणारी कपात सरकार करणार असेल तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार आत्महत्या करायला लावणार आहे का? मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हा कपातीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा, गावगाड्यातील शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने सदरचा निर्णय तातडीने रद्द करावा, असे शेतकरी संघटनेचे राहुल बिडवे यांनी सांगितले

Web Title: The rayat kranti organization has become aggressive due to the governments decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • sadabhau khot news
  • Sugarcane Bill

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश
1

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध
2

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
3

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल
4

चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.