Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात खते, बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही, कृषी विभागाचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचेही आवाहन

‘खरीप हंगाम २०२२’ मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे १.७१ कोटी बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे ९८ टक्के क्षेत्र आहे. बीटी कापसाच्या बियाण्यांची २.०१ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकासाठी एकूण ३४.५ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2022 | 02:16 PM
राज्यात खते, बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही, कृषी विभागाचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचेही आवाहन
Follow Us
Follow Us:

मुंबई : यंदा कापूस, सोयाबीन बियाण्यांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चुकीची माहिती अथवा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध

‘खरीप हंगाम २०२२’ मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे १.७१ कोटी बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे ९८ टक्के क्षेत्र आहे. बीटी कापसाच्या बियाण्यांची २.०१ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकासाठी एकूण ३४.५ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

सोयाबीन पिकाखालील नियोजित क्षेत्र ४६.०० लाख हेक्टर आहे. त्यासाठी एकूण ३४.५ लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत सार्वजनिक व खासगी क्षेत्रातून १४.६५ लाख क्विंटल एवढे बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त खरीप २०२० पासून घरचे बियाणे राखून ठेवायची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत ‘खरीप २०२१’ हंगामात ४४.४६ लाख क्विंटल बियाणे उत्पादित झाले. उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनातून ४.३७ लाख क्विंटल असे एकूण ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होत आहे.

त्यामुळे बियाण्याचा तुटवडा होणार नाही. तसेच खरिपात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग व तीळ ही इतर पिके घेतली जातात. या बियाण्यांचा देखील तुटवडा भासणार नाही. टी कापसाचे दर हे केंद्र शासन ठरवत असल्यामुळे बियाणे जादा दराने विकण्याचा प्रश्‍न उद्‍भवत नाही. केंद्र शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच विक्री होते, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

दरम्यान राज्यातील मागील ३ वर्षांतील सरासरी खत वापर ४१.७३ लाख मे. टन आहे. खरीप हंगाम २०२२ साठी केंद्र शासनाने एकूण ४५.२० लाख मेट्रिक टन आवंटन मंजूर केले. आधी एकूण १२.१५ लाख मे टन खत उपलब्ध होते. सध्या एकूण १७.१७ लाख मे टन खत उपलब्ध आहे.

‘दर्जेदार खते, बियाणे पुरवावेत’

शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाण्यांचा पुरवठा व्हावा. कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाला दिले. त्यानुसार कृषिमंत्री दादा भुसे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कृषी विभागातील यंत्रणेला यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

[read_also content=”कांद्याला बाजार हस्तक्षेप योजनेत समाविष्ट करा; डॉ. भारती पवार यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिफारस https://www.navarashtra.com/maharashtra/include-onions-in-the-market-intervention-plan-dr-bharti-pawars-recommendation-to-union-agriculture-minister-nrdm-289224.html”]

तक्रारींसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष

राज्यस्तरावर हेल्पलाइन नंबर (८४४६११७५००, ८४४६३३१७५०, ८४४६२२१७५०) राज्यभर प्रसारित केले आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त प्रत्येक जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कृषी निविष्ठा या दर्जेदार गुणवत्तेच्या असाव्यात, यासाठी राज्यात ११३१ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. अप्रमाणित आढळलेल्या नमुन्यावर न्यायालयीन खटला दाखल करणे, अप्रमाणित साठ्यास विक्री बंद आदेश देणे, अशी कार्यवाही करण्यात येत आहे. या शिवाय खतांचा काळाबाजार, साठेबाजी, चढ्या दराने खताची विक्री, खते असूनही ती न देणे आदी गोष्टी टाळण्याकरिता विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केली आहेत. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८४४६११७५००, ८४४६३३१७५० व ८४४६२२१७५० उपलब्ध आहेत.

Web Title: There will be no shortage of fertilizers and seeds in the state nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2022 | 02:16 PM

Topics:  

  • Agriculture Minister Dada Bhuse
  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी ‘प्रीमियम टॉयलेट’; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम
1

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी ‘प्रीमियम टॉयलेट’; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
2

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
3

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
4

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.