Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मयदिपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र ही मदत मिळवण्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2026 | 03:45 PM
Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Follow Us
Close
Follow Us:
  • हेक्टरी 10 हजारांची मदत मिळणार! पण आधी ई-KYC करा, सेतू केंद्रांवर लांबच लांब रांगा
  • शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! ई-KYC न केल्यास मदतीची रक्कम अडकू शकते
  • प्रशासनाने जाहीर केली लाभार्थ्यांची यादी; मदतीसाठी ई-KYC करणे बंधनकारक
पालांदूर: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धान पिकाचे आतोनात नुकसान झाले होते. पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे कापून ठेवलेले धान अंकुरल्याने संपूर्ण हंगाम वाया गेला होता. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आता प्रशासनाने पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली असून, मदतीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिणामी, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी पालांदूर आणि परिसरातील सेतू केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे.

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

प्रशासनाने समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मयदिपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नुकसानीची यादी प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्याने आपले नाव शोधण्यासाठी आणि तातडीने ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील ऑनलाइन सेवा वारंवार एका विस्कळीत होत असल्याने शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागत आहे, ज्यामुळे रांगा अधिकच वाढत आहेत. शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी असंख्य तास लागल्याने रांगा अधिकच लांबल्या आहेत. या समस्येमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण आहे. प्रशासनाने या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच यासंदर्भात अनेकवेळा तक्रार केल्यानंतरही अद्यापही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बँक खात्यांतील माहितीच्या त्रुटींनी वाढवली चिंता

प्रशासनाने पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती संकलित केली होती. मात्र, आता समोर आलेल्या यादीमध्ये काही शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकीचे नोंदवले गेल्याचे उघड होत आहे. तांत्रिक चुकांमुळे हक्काची मदत अडकण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. अशा त्रुटींमुळे शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवरच शिबिरे घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

शेतकऱ्यांनी घाई न करण्याचे आवाहन

एकाच वेळी शेकडो शेतकरी केंद्रांवर पोहोचत असल्याने सर्व्हरवर ताण येत आहे. ईकेवायसी करण्यासाठी आजचीच मुदत अनिवार्य नसल्याने शेतकऱ्यांनी संयम ठेवावा आणि सीएससी केंद्रांना सहकार्य करावे, असे खराशी येथील सीएससी केंद्रधारक कार्तिक झलके यांनी सांगितले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bhandara news ekyc mandatory for compensation flood affected farmers crowd at setu centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Bhandara
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास
1

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?
2

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान
3

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 
4

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.