Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटतोय; हजारो गावांना टँकरने होतोय पुरवठा, आकडेवारीही आली समोर…

राज्यात गेल्या वर्षी फक्त 1308 वाड्या आणि गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदाची परिस्थिती त्याहून बिकट आहे. सध्या 3072 गावे आणि 7931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2024 | 09:22 AM
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटतोय; हजारो गावांना टँकरने होतोय पुरवठा, आकडेवारीही आली समोर…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत होतान दिसत आहे. इतकेच नाहीतर बहुतांश धरणांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. त्यामुळे राज्यात पाणीपुरवठा (Water Tanker) करणाऱ्या टँकरच्या संख्येने विक्रमी उच्चांक गाठला आहे. राज्यातील 11 हजारांहून अधिक वाड्या-वस्त्यांना तब्बल 3700 हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

राज्यात गेल्या वर्षी फक्त 1308 वाड्या आणि गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यंदाची परिस्थिती त्याहून बिकट आहे. सध्या 3072 गावे आणि 7931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून, जनावरांना पाणी मिळणे अत्यंत कठीण आहे. परिणामी, पशुधन संकटात आले आहे.

नाशिक, संभाजीनगरात मोठी कमतरता

नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १,२७८ गावे आणि ५०५ वाड्या तर नाशिक विभागात ७९२ गावे आणि २,७१३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील ६४९ वाड्या आणि ३,८८७ गावांना टँकरद्वारे पाणीपुवरठा सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नांदगाव तालुक्यात ७७ टँकरद्वारे १७२ फेर्‍या , येवला तालुक्यात ५७ टँकरद्वारे ११८ फेर्‍या, मालेगावमध्ये ४९ टँकरद्वारे ९८ फेर्‍या, सिन्नरमध्ये ४४ टँकरद्वारे १२४ फेर्‍या, बागलाणमध्ये ४२ टँकरद्वारे ६३ फेर्‍या होत आहेत.

असा सुरु आहे जिल्हावार टँकरने पाणीपुरवठा

  • ठाणे ४७
  • रायगड ४७
  • रत्नागिरी २४
  • पालघर ५०
  • नाशिक ३९०
  • धुळे १०
  • जळगाव १०८
  • नगर ३३६
  • पुणे २५६
  • सातारा २०२

Web Title: Thousands of villages are being supplied water by tankers in maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2024 | 09:14 AM

Topics:  

  • heat wave
  • maharashtra
  • Water supply
  • Water Tanker

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.