Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीमध्ये वादाला फुटले तोंड! निलेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याची फडणवीसांकडे करणार तक्रार, उदय सामंत भडकले

आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 07, 2024 | 04:42 PM
महायुतीमध्ये वादाला फुटले तोंड! निलेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याची फडणवीसांकडे करणार तक्रार, उदय सामंत भडकले
Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यानंतर आता महायुतीमधील अंतर्गत वाद समोर येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदरासंघामध्ये भाजप नेते नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नारायण राणे यांचा विजय झाला असून यानंतर आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र डागलं. महायुतीमध्ये असणारे व शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याविरोधात त्यांनी वक्तव्य केले होते. यावर उदय सामंत यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले असून भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

नारायण राणे यांचा विजय झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीकास्त्र डागलं. पण त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना देखील इशारा दिला होता. उदय सामंत यांच्या मतदारसंघात नारायण राणे यांना कमी मतं मिळाली असे म्हणत राणे कधीही माफ करत नाहीत असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला होता. त्याआधी आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार

भाजप नेते नितेश राणे यांच्या या आरोपावर उदय सामंत यांच्याकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उदय सामंत म्हणाले, माझ्या मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नसल्याने मतदार नाराज होते. त्यामुळें कदाचित त्यांनी ही नाराजगी मतांच्या स्वरूपात दाखवली. त्यानंतर ही नाराजगी थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो. मात्र सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम करत नारायण राणेंना निवडून दिलं. नारायण राणे यांच्या बाबतीत कोणीही वेगळं काम केलेलं नाही. त्यांना 75 हजार मतांपर्यंत आम्ही पोहचवलं हे नारायण राणेंना माहीत आहे. मात्र असं असताना देखील माझा मतदारसंघ भाजपसाठी मागणे किंवा माझ्यावर आक्षेप घेणे याबाबतीत मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे. फडणवीस यांनी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सुध्दा याबाबतीत माहिती घेतली पाहिजे, असे चोख उत्तर उदय सामंत यांनी दिले आहे.

महायुतीमध्ये वादाची ठिणगी

पुढे त्यांनी नितेश राणे यांच्या मतदारसंघाच्या दाव्यावर देखील उत्तर दिले. उदय सामंत म्हणाले, मी प्रचारात कमी पडलो असेल तर ते सुद्धा दाखवून द्या. निलेश राणे यांच्यावर आक्षेप घेणे हे लोकशाही नुसार चुकीचे आहे. परंतु आमचा मतदारसंघ मागितल्यानंतर आता निलेश राणे यांच्या या वक्तव्यावर महायुतीमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. याबाबतीत महायुतीच्या नेत्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे.”असे थेट उत्तर उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या आधीच राणे कुटुंब व उदय सामंत यांच्यामध्ये मतभेद सुरु झाले आहे.

Web Title: Uday samant will complaint to bjp devendra fadnavis against nilesh narayan rane loksabha elections 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • Loksabha Elections Result 2024
  • political news

संबंधित बातम्या

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
1

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
2

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
3

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
4

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.