Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर अशा लोकांना ठोकून काढा, राज्यपाल व सुधांशू त्रिवेदी यांच्यावर उदयनराजेंचा घणाघात

राज्यपालांना राज्यातून हद्दपार केले पाहिजे, तर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी अशा लोकांना ठोकून काढले पाहिजे मग ते ठिकाणावर येतील अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उद्यनराजे भोसले यांनी दिली आहे. यावेळी त्यांना राज्यपाल व सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच केंद्राने आता राज्यपालांना परत बोलावले पाहिजे, ते वांरवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 21, 2022 | 03:36 PM
…तर अशा लोकांना ठोकून काढा, राज्यपाल व सुधांशू त्रिवेदी यांच्यावर उदयनराजेंचा घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

सातारा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने हा मुद्धा उचलून धरत राज्यपाल व भाजपावर टिका केली होती. तसेच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उन्हाळी अधिवेशनात सभागृहात देखील उमटले. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यातच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधान केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.

[read_also content=”सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी ‘या दोन मंत्र्यांची’ झाली नियुक्ती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/two-ministers-have-been-appointed-to-solve-the-issues-in-maharashtra-karanatka-border-346964.html”]

दरम्यान, आता भाजपा खासदार उद्यनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना राज्यातून हद्दपार केले पाहिजे, तर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी अशा लोकांना ठोकून काढले पाहिजे मग ते ठिकाणावर येतील अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. यावेळी त्यांना राज्यपाल व सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच केंद्राने आता राज्यपालांना परत बोलावले पाहिजे, ते वांरवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

काय म्हणाले राज्यपाल?

दरम्यान, आज मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. मात्र आता नवीन काळातील नितीन गडकरी हे आदर्श आहेत, असं राज्यपालांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर मविआ, संभाजी ब्रिगेड तसेच शिवप्रेमीतून संतप्त प्रतिक्रिया येत असून, राज्यपालांवर टिका होत आहे. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) तसेच शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित होते. याआधी सुद्धा राज्यपालांनी  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

पूर्वी काय म्हणाले होते राज्यपाल?

राजभाषा मराठी दिनानिमित्त औरंगाबादमध्ये श्रीसमर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. त्यामुळं समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असं राज्यपाल म्हणाले होते, तेव्हा त्यावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

Web Title: Udayanraje attack on the governor and sudhanshu trivedi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2022 | 03:34 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • Nitin Gadkari
  • Udyanraje bhosale

संबंधित बातम्या

शेणाने रंगवलेल्या भिंती; फराह खानने उघड केला नितीन गडकरींच्या घराचा वेगळा पैलू, पाहा Video
1

शेणाने रंगवलेल्या भिंती; फराह खानने उघड केला नितीन गडकरींच्या घराचा वेगळा पैलू, पाहा Video

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन
2

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.