Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vibhajan Vibhishika Smriti Diwas: “विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह…”, मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आवाहन

राज्यातील एका हजार आयटीआयमध्ये आज ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना काही महत्वपूर्ण आवाहन केले.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 14, 2025 | 08:05 PM
राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण (फोटो सौजन्य: X.com)

राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण (फोटो सौजन्य: X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील दाहकतेचा निषेध करत आणि त्या काळात भारतीय जनतेने सहन केलेल्या यातना, विस्थापन व बलिदानांच्या स्मृती जपण्यासाठी आज राज्यभरातील सुमारे एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “देशाला तोडणाऱ्या विघटनवादी शक्तींना ठामपणे दूर सारून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा ध्यास घ्यावा.”

दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२१ साली घेतला. या दिवसाचे उद्दिष्ट असे की, फाळणीच्या काळात भारतीयांनी भोगलेल्या वेदना व संघर्ष विसरला जाऊ नये, तसेच भावी पिढीत सामाजिक सलोख्याची आणि एकतेची भावना दृढ व्हावी. १९४७ च्या फाळणीत लाखो लोकांना घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हावे लागले. यात हजारो लोकांनी आपला जीव गमावला आणि असंख्य कुटुंबे तुटली. या ऐतिहासिक घटना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना देशाच्या अखंडतेचे महत्व पटवून देण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.

Karjat News : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना फक्त कागदावरच ; वन जमीन मिळत नसल्याने आदिवासी कार्यकर्ते आक्रमक

राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना फक्त तांत्रिक ज्ञानच नव्हे तर रोजगाराभिमुख कौशल्ये दिली जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थांमध्ये विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर, मंत्री लोढा यांनी प्रत्येक आयटीआयमध्ये दरमहा एक सामाजिक जबाबदारी वाढवणारा कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. या श्रेणीत ऑगस्ट महिन्यासाठी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ निवडण्यात आला.

Thane News : गोविंदांच्या मदतीला धावून येणार ठाणे मनपा; जखमी गोविंदांसाठी सिव्हील रुग्णालयात विशेष कक्ष

या निमित्ताने राज्यातील शासकीय व खाजगी मिळून एक हजार आयटीआय संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले गेले. फाळणीविषयक चित्रप्रदर्शन, ऐतिहासिक छायाचित्रांची प्रदर्शने, व्याख्याने, तसेच नाट्यप्रयोग यांद्वारे विद्यार्थ्यांना त्या काळातील घटनांची माहिती देण्यात आली.

या स्मरणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि देशाच्या एकात्मतेबाबत नवी प्रेरणा त्यांना मिळाल्याचे दिसले.

Web Title: Vibhajan vibhishika smriti diwas in one thousand itis mangal prabhat lodha appealed students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
1

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे
2

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर
3

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
4

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.