Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी विविध ठेव योजना लागू करण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवनिमित्त 'नवदुर्गा सुयश ठेव' योजना घटनस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 04, 2025 | 07:04 PM
Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी विविध ठेव योजना लागू करण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजना घटनस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात आली. या योजनेत ठेवीला ९% टक्के व्याजदर ठेवण्यात आला होता. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अवघ्या ९ दिवसांत या योजनेत तब्बल ३ कोटी ६१ लाख रुपये संकलित झाले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात एकूण ठेवीत तब्बल १५ कोटी ४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. तर ठेवीदारांना दिपावलीकरिता सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली असून ६ ते ११ महिने मुदत ठेवींवर उत्तम ९.५५% व्याजदर दिला जाणार असून या ठेव योजनेत सर्वसामान्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी केले आहे.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची १९ ऑक्टोबर १९९३ रोजी झाली असून संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे. संस्थेची सभासद संख्या १ लाख ४५ हजार१०१, भाग भांडवल ७८ कोटी ७९ लाख रुपये, स्वनिधी १७७ कोटी ५७ लाख, ठेवी १ हजार १८२ कोटी, कर्जे १ हजार १७ कोटी, पैकी प्लेज लोन ४०२ कोटी ९८ लाख, सोने कर्ज ३४८ कोटी ३० लाख, गुंतवणुका ३०० कोटी ७६ लाख रुपये, मालमत्ता ४० कोटी ५१ लाख, नफा मार्च अखेर २१ कोटी २ लाख रुपये, एकूण शाखा ५० असून या शाखांच्या माध्यमातून हा आर्थिक कारभार सुरू आहे.

चिपळूण नागरीने सुरुवातीपासून आर्थिक पारदर्शकतेला प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. कोरोना असो, महापूर असो, तिवरे फुटीची दुर्घटना असो या संकटमयी काळात चिपळूण नागरी पतसंस्था लोकांच्या मदतीला धावून गेली आहे. विशेष म्हणजे कोरोना कालखंडात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देत महाराष्ट्रात इतका निधी देणारी वित्तीय संस्थांमध्ये चिपळूण नागरी अग्रेसर राहिल्याचे दिसून आले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाखांचे जाळे रोवलेल्या राज्यातील प्रसिद्ध चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने” आपली माणसे ! आपली संस्था या ब्रिदवाक्या प्रमाणे नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले आहे. यानुसार इथला तरुण, शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला पाहिजे, ही भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची राहिली आहे. यातून स्वयंरोजगार कर्ज, शेतीपूरक कर्ज, महिलांना स्वावलंबी कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून या सर्वांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात संस्थेने मोठा हातभार लावला आहे. विशेष म्हणजे कर्ज योजनेच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय उभे राहिले आहेत, ही मोठी सकारात्मक बाब ठरली आहे.

याचबरोबर सभासदांना बचतीची सवय लागावी, यासाठी अनेक योजना चिपळूण नागरीने सुरू केल्या आहेत. यामध्ये गेल्या ३३ वर्षांच्या कालखंडात श्रावणमास, धनलक्ष्मी, संकल्प ठेव, श्री गणेश ठेव,उत्कर्ष ठेव, धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव व धनसंचय ठेव, राष्ट्र अमृतमहोत्सव ठेव, संकल्प ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धिनी, दामदुप्पट, दामतिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत.

Ratnagiri News : चिपळूण न्यायालयाचे स्थलांतर करू नये; भाजप चिपळूण उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

यामध्ये आवर्त ठेव योजनेंतर्गत ४३ हजार खातेदारांकडून दरमहा ६ कोटी ३० लाखांच्या ठेवी संकलित होत आहेत. हे खातेदार १०० रुपयांपासून गुंतवणूक करीत आहेत. तसेच महिलांसाठी सुकन्या ठेव , गृहलक्ष्मी ठेव योजना तसेच सक्षम महिला सक्षम कुटुंब कर्ज योजना संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित आहेत.

नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजना घटस्थापनेच्या दिवशी सुरु करण्यात आली. या योजनेचा कालावधी १५ दिवसांचा ठेवण्यात आला होता. यामध्ये या ठेवींवर ९% व्याज दर देण्यात आला. ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अवघ्या ९ दिवसांत या योजनेत ३ कोटी ६१ लाख रुपये संकलित झाले आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी यावेळी दिली. तर आता दीपावली सणानिमित्त ठेविदारांना सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आले आहे.

यामध्ये ६ ते ११ महिने मुदत ठेवीवर ९.५५ टक्के इतका व्याज दर ठेवण्यात आला असून या ठेव योजनेत सहभागी होण्याबरोबरच स्वयंरोजगार कर्ज, शेतीपूरक कर्ज, महिलांना स्वावलंबी कर्ज योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sindhudurga: ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटला तीव्र विरोध; कुडाळमध्ये दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण

 

 

Web Title: Ratnagiri news chiplun nagaris navdurga suyash thep scheme received a spontaneous response on the occasion of navratri festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • Chiplun
  • Marathi News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
1

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
2

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
3

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
4

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.