
Vidarbha News: केंद्र सरकारची ‘मोठी भेट’! गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी
या प्रकल्पामुळे विदर्भातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. प्रकल्पाचा नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम व भंडारा जिल्ह्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा-नळगंगा नदीत आणले जाणार आहे. यासाठी विदर्भातील ८ जिल्ह्यांतून ३८८.२८ कि.मी. लांबीचा कालवा तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पात एकूण २०.४९ कि. मी.च्या १३ बोगद्यांचा समावेश आहे. विदर्भातील ८ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यातून कालवा जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम व भंडारा जिल्ह्यांना या प्रकल्पाचा थेट फायदा होईल.
वैनगंगा, नळगंगा प्रकल्प यापूर्वी केवळ प्रक्रियेत होता, मात्र, मुख्यमंत्र्यानी ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे निधींची कमतरता भासणार नसल्याचेही महाजन यांनी नमूद केले. आतापर्यंत प्रकल्पाची व्याप्ती मयादित होती. परंतु ती वाढवून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. कामाची सुरुवात झाल्याची माहितीही महाजन यांनी दिली.
Uttarpradesh Crime: प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल
प्रकल्पासाठी एकूण ९५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी ६० टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे, तर उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकार उचलेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिरिक्त पाण्याचे नियोजन: वैनगंगा नदीतील पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी (जे दरवर्षी वाया जाते) ४२६ किमी लांबीच्या कालव्याद्वारे पश्चिम विदर्भातील नळगंगा प्रकल्पापर्यंत नेले जाईल.
पिण्याचे पाणी आणि उद्योग: या प्रकल्पामुळे केवळ शेतीलाच नाही, तर अनेक शहरे आणि एमआयडीसी (MIDC) क्षेत्रांना पिण्याच्या आणि औद्योगिक पाण्याचा पुरवठा होईल.
दुष्काळावर मात: पश्चिम विदर्भातील ‘आत्महत्याग्रस्त’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमधील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.
भूजल पातळीत वाढ: कालव्याच्या मार्गावरील शेकडो तलाव आणि बंधारे भरल्यामुळे भूजल पातळीत लक्षणीय वाढ होईल.