Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुशी गावाचा 110 वर्षांचा संघर्ष संपला! आमदार शेळके यांच्या पाठपुराव्यानंतर ग्रामस्थांना मिळाले प्रॉपर्टी कार्ड्स

1913 साली टाटा धरण प्रकल्पासाठी भुशी गाव विस्थापित झाल्यानंतर ग्रामस्थांचे कायदेशीर पुनर्वसन झाले नव्हते. यानंतर आता त्यांना राहत्या घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 16, 2025 | 03:41 PM
Villagers displaced for Tata Dam project in Bhushi village get property cards

Villagers displaced for Tata Dam project in Bhushi village get property cards

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील भुशी गावाचा तब्बल ११० वर्षांपासून रखडलेला राहत्या घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर सुटला आहे. यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पाठपुरवठा केला होता. बुधवारी (१५ ऑक्टोबर) रोजी शासनाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले.  या कार्यक्रमाला मावळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख पल्लवी पिगळे तसेच लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साबळे हे मान्यवर उपस्थित होते.

1913 पासूनचा संघर्ष होता सुरु

भुशी गावातील ग्रामस्थांचा हा संघर्ष 1913 साली सुरू झाला. टाटा धरण प्रकल्पासाठी गाव विस्थापित झाल्यानंतर ग्रामस्थांचे कायदेशीर पुनर्वसन झाले नव्हते. परिणामी, गावकऱ्यांकडे त्यांच्या राहत्या घरांच्या मालकी हक्काचा कोणताही सरकारी पुरावा नव्हता. अनेक पिढ्यांनी शासनदरबारी धावपळ केली, अर्ज सादर केले, परंतु प्रश्न कायम प्रलंबित राहिला.

१०७६ पासून पांडुरंग मराठे, सोपान मराठे, भागूजी न्हालवे यांसारख्या ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी, आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा शासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत मांडला आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून प्रकरण मार्गी लावले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आज प्रत्यक्ष प्रॉपर्टी कार्डे ग्रामस्थांना मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अनेकांनी आमदार शेळके यांनी आमचा न्यायाचा लढा पूर्ण करून दिला असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली. हा निर्णय ग्रामस्थांसाठी नव्या आयुष्याची नवी सुरुवात ठरत आहे. भुशी गावाचा ११० वर्षांचा प्रॉपर्टी हक्काचा प्रश्न सुटल्याने मावळ तालुक्यात ऐतिहासिक पाऊल पडले आहे. शासनाच्या अधिकारी वर्गाच्या सहकार्याने आणि आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वामुळे शेकडो कुटुंबांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाली आहे. हा दिवस भुशी ग्रामस्थांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार श्रीरंग बारणे यांनी नगररचना योजना रद्द करण्याची मागणी

मावळ मतदारसंघातील धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे आणि मुळशीतील नेरे या गावांमध्ये प्रस्तावित नगररचना योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) वरील गावांसाठी नगररचना योजना प्रस्तावित केली असून, त्याबाबतची नोटीस जाहीर केली आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी या योजनेला तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्रामसभांमध्ये या योजनेविरुद्ध ठरावही पारित करण्यात आले आहेत. खासदार बारणे यांनी सांगितले की, “या योजनेपूर्वी ग्रामस्थांशी कोणतीही चर्चा किंवा संमती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ही कारवाई न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचा भंग करणारी आहे. या योजनेतून मोठ्या बिल्डर लॉबीला फायदा मिळणार असून, लहान शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. एफएसआय स्वरूपात मोबदला देण्याची पद्धत बेकायदेशीर असून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे.”

Web Title: Villagers displaced for tata dam project in bhushi village get property cards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • maval news
  • Tata Group
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

BJPचे स्वप्न भंगले, मावळमध्ये APMC समिती झाली बरखास्त; प्रशासकाची नियुक्ती,
1

BJPचे स्वप्न भंगले, मावळमध्ये APMC समिती झाली बरखास्त; प्रशासकाची नियुक्ती,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.