Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं; विनोद तावडे यांचं मत

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर टीका करायचे पण जेवण सहकुटुंब करायचे, आता मात्र राजकारणात 'हेल्दी रिलेशन' आज राहिलेले नाही, असे मत विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 20, 2025 | 03:48 PM
महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं; विनोद तावडे यांचं मत

महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं; विनोद तावडे यांचं मत

Follow Us
Close
Follow Us:
  • राजकारणात ‘हेल्दी रिलेशन’ आज राहिलेले नाही
  • पूर्वी हेल्दी रिलेशन असायचे
  • विनोद तावडे यांनी व्यक्त केले मत
पुणे : राजकारणात ‘हेल्दी रिलेशन’ आज राहिलेले नाही. मीही विरोधी पक्षनेता होतो. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार प्रखर टीका करायचे, पण जेवायला एकत्र असायचे. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपण नीट अभ्यासले पाहिजेत. अटलजींनी त्यांच्या काळात पायाभूत सुविधा निर्माण केल्या. गावापर्यंत रस्ते बांधले, सुवर्ण चतुष्कोन निर्माण केला. अटलजी यांचे विविध पैलू तरुण पिढीने घेतले पाहिजे, असे मत भाजप नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे.

तावडे म्हणाले, पूर्वी हेल्दी रिलेशन असायचे पण विरोधी पक्ष नेत्याचे सुद्धा कर्तृत्व होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात आता हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं. ज्या प्रकारची हमरी तुमरी होते, सकाळी ९ वाजता भोंगा वाजतो त्याला उत्तरं दिली जातात. मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो, मी मुख्यमंत्री यांच्यावर तडाखून टीका करायचो. अधिवेशन सुरू असताना जोरदार टीका व्हायची. मधल्या सुट्टीत म्हणजेच जेवणाची सुट्टी झाली की मी माझ्या केबिनमध्ये मुख्यमंत्री त्यांच्या केबिन मध्ये जायचे. मला मुख्यमंत्री यांचा शिपाई चिठ्ठी घेऊन यायचा ‘तुमच्या वाहिनीने डबा पाठवला आहे की जेवायला येणार का?’ मी जेवायला जायचो. पुन्हा सभागृहात आलो की पुन्हा टीका करायची, असं यावेळी तावडे यांनी सांगितलं.

तेंव्हा मुख्यमंत्री उभे रहायचे आणि म्हणायचे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा आहे. इथे मराठी माणूस खाल्ल्या मिठाला जागतो असे कसे विरोधी पक्ष नेते? मी उभा राहिलो महोदय मी सुद्धा महाराजांचा मावळा आहे, शाहू फुलेंचा अनुयायी आहे, चिठ्ठी काढत दाखवली की ‘तुमच्या वाहिनीने डबा पाठवला आहे, मीठ वहिनींचे होते’ असे खेळीमेळीचे वातावरण होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर टीका करायचे पण जेवण सहकुटुंब करायचे, असंहा तावडे पुन्हा एकदा म्हणाले.

Web Title: Vinod tawde has expressed his opinion on maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • MP Sharad pawar
  • Vinod Tawde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.