
६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी
वर्धा, ब्युरो : जिल्ह्यात महावितरणचे ३.५५ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी ५१ हजार ग्राहकांकडे विद्युत देयकापोटी महावितरणची १२.३२ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीची वेळीच वसुली व्हावी म्हणून महावितरणच्यावतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. तर सूचना देऊनही थकीत देयक अदा न करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत ६०० हून अधिक ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे सांगण्यात आले.
महावितरणने जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार नागरिकांना घरगुती वापरासाठी वीज जोडणी दिली आहे. तर २२ हजार १८९ नागरिकांना व्यावसायिक वापरासाठी वीज जोडणी महावितरणने दिली. याशिवाय औद्योगिक वापरासाठी ४ हजार ८५८ संस्थांना वीज जोडणी महावितरणने दिली आहे. मात्र, ५१ हजार ग्राहकांकडे विद्युत देयकापोटी चक्क १२ कोटी ३२ लाख थकल्याने थकबाकी वसुली मोहीम महावितरणच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. तसेच जे ग्राहक महावितरणच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६०० हून अधिक ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे.
Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार
४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा …
थकबाकीदार व वेळीच देयक अदा न करणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणव्यावतीने खंडित केला जात आहे, ज्या थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्या ग्राहकाने वीज देयक अदा केल्यावर ३३० रुपये रिकनेक्शन चार्जेस घेत महावितरण वीज जोडणी करून देत आहे. थकबाकीदारास महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून थकबाकी वेळीच अदा करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहे.