Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कसले पन्नास खोके, मिठाईचे की…?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर

अन्यायला वाचा फोडण्यासाठी पेटून उठायला बाळासाहेबांनी सांगितलं होतं. हे बंड नाही. ही क्रांती आहे. हे स्वेच्छेने आले आहेत. त्यांना आरोप करायला आता काही नाही, म्हणून काहीही बोलत बसतात. आम्ही अडीच वर्षे पूर्ण करू एवढी कामं करू, आम्ही लोकांसारखं पंचवीस वर्षे सांगणार नाही. पण पुढची निवडणूक तर नक्की जिंकू. कामासाठी लोक माझ्याकडे येतात. बाकी कुणी माझ्याकडे आलं नाही.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 09, 2022 | 03:48 PM
‘कसले पन्नास खोके, मिठाईचे की…?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : “फक्त ५० खोके… खोके कसले… मिठाईचे… गंमतीचा भाग जाऊ द्या. हे आमदार लाखो लोकातून निवडून आलेले आहेत. साधा ग्रामपंचायत सदस्य पक्ष बदलत नाही. इकडे आमदार एवढ्या प्रमाणात आले”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपाना उत्तर दिले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून होत आहे. जनता सुजाण आहे. कोणी काहीही बोललं तरी आम्ही आमचं काम करत राहू. शिवसेना भाजप युतीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आम्ही केलं आहे. कसले पन्नास खोके, मिठाईचे की कसले? नगरसेवकही इकडे तिकडे जायला घाबरतात. मात्र आमदारांना त्यांचं कर्तव्य पार पाडू शकत नाही, अशी स्थिती झाली होती. सावरकरांवर आम्ही बोलू शकत नव्हतो.

अन्यायला वाचा फोडण्यासाठी पेटून उठायला बाळासाहेबांनी सांगितलं होतं. हे बंड नाही. ही क्रांती आहे. हे स्वेच्छेने आले आहेत. त्यांना आरोप करायला आता काही नाही, म्हणून काहीही बोलत बसतात. आम्ही अडीच वर्षे पूर्ण करू एवढी कामं करू, आम्ही लोकांसारखं पंचवीस वर्षे सांगणार नाही. पण पुढची निवडणूक तर नक्की जिंकू. कामासाठी लोक माझ्याकडे येतात. बाकी कुणी माझ्याकडे आलं नाही. कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही. मी मुख्यमंत्री झालोय त्यामुळे ते माझ्या सदिच्छा भेटाला येतातच. मला कुठलीही बैठक माहिती नाही. ओबीसी समाजाला न्याय देण्याची हीच आमची भूमिका होती. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर निवडणुका व्हाव्यात हीच आमची इच्छा होती.

पाऊस येत आहे, पूर आला आहे, निवडणुकांची तयारी करायला मॅन पॉवर लागते. मात्र अनेक लोकांनी सांगितलं आहे की निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये. त्यामुळे आमचीही तीच भूमिका आहे. युतीचे सरकार असताना केंद्र सरकारने मदत केली आहे. पंतप्रधानांनी आत्ताच्या सरकारलाही तेच सांगितलं आहे.

Web Title: What fifty boxes sweets cm eknath shinde responds to rauts criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2022 | 03:48 PM

Topics:  

  • BJP
  • Cm Eknath Shinde
  • Criticism On Sanjay Raut
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
1

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
2

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा
3

‘भाजपाने राहुल गांधींचा धसका घेतला’; पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर कन्हैया कुमारांचा दावा

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
4

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.