
Beed Politics News: हुंडा प्रथा थांबवण्यासाठी कडक कधी होणार? आ. नमिता मुंदडा यांचा सरकारला सवाल
हे देखील वाचा: Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२३ च्या आकडेवारीनुसार देशात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत १५ हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले गेले असून ६ हजारांहून अधिक महिलांना हुंड्यासाठी जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी समाजासाठी गंभीर इशारा असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईसारख्या शहरात २०२४ मध्ये हुंडा छळाची ४३० प्रकरणे नोंदवली गेली असून २०२५ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच ही संख्या १६० च्या पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले.
हुंडा प्रतिबंधक कायदा अधिक कडक करणार
बीड जिल्ह्यातील परिस्थिती तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करत हुंडा घेणाऱ्या कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. गेल्या पाच वर्षांतील गुन्ह्यांची संख्या, दोषींना झालेली शिक्षा, एफआयआर नोंदणीसाठी लागणारा वेळ आणि जनजागृतीसाठी राबवलेल्या उपक्रमांबाबत सरकारला प्रश्न विचारले.
हे देखील वाचा: Kej Nagar panchayat: केज नगरपंचायतीत PM आवास योजनेत ३.६२ कोटींचा घोटाळा? राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश
सरकारच्या वतीने उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी गेल्या पाच वर्षांतील कारवाईची माहिती सभागृहात दिली. २०२१ मध्ये १७२ गुन्हे नोंदवून ५३४ जणांना अटक करण्यात आली होती, तर २०२४ मध्ये ही संख्या १३९ गुन्ह्यांपर्यंत कमी झाली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत १३८ गुन्हे नोंदवून २१३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा अधिक कडक करण्याबाबत शासन सकारात्मक असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना, मोफत उच्च शिक्षण आणि बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.