आज १४ एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची १३१ वी जयंती आहे. त्यानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. अनेक भीम अनुयायी या दिवशी उत्साहाने ही जयंती सणरुपी साजरी करतात. तब्बल दोन वर्षानंतर यंदा जयंतीचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) लिहित बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. तिची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
हेमांगी कवीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय,
हेमांगी कवीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय. “मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!”, असं हेमांगी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नेहमीच चर्चेत राहणारी हेमांगी या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यातील एका कमेंटला तिने उत्तरही दिलं, “कमी पडतीयेस तर तू आत्मक्लेश कर, बाबासाहेब जगणारे आणि फक्त अटेंशन सेंट्रिक म्हणून बाबासाहेब मानणारे या दोन वृत्ती मध्ये खूप फरक आहे हेमांगी. जमलं तर बाबासाहेब जगून बघ, कुठलाही प्रमाणभाषेतला माई का लाल तुला ट्रोल करणार नाही. जयभीम!”, असं एक युझर म्हणाला आहे. या कमेंटवर हेमांगीने प्रतिक्रिया दिली आहे. “कुठल्याही राजकीय, कलाकार लोकांनी मनापासून काही लिहिलं की ते attention मिळवण्यासाठी असतं असं नसतं. कधी कधी Social media वरच्या काही likes आणि comments च्या हव्यासासाठी नसतं. आणि हा कधी कधी मधला जो फरक आहे ना तो महत्वाचा आहे. माझ्या मित्र यादीतल्या एका जरी माणसावर मी लिहिलेल्या गोष्टीने फरक पडला तरी खूप आहे. माझ्यावर सुद्धा असंच कुणाकुणाचं वाचून, पाहून परिणाम झाला. प्रत्येक वेळी judgemental होणं योग्य नाही! जय भीम”, असं हेमांगी म्हणाली आहे.






