Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरीही अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत:च व्यक्त केली मनातली खदखद

अभिनेत्याने ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर वर्षभरानंतर पुरस्कारासंबंधित भाष्य केले आहे. अल्लू अर्जुनला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा तो दु:खी होता. त्या मागील कारण त्याने सांगितलंय.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 16, 2024 | 07:37 PM
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरीही अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत:च व्यक्त केली मनातली खदखद

‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरीही अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत:च व्यक्त केली मनातली खदखद

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनने महत्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटासाठी अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सर्वच स्तरातून चित्रपटाचे कौतुक झाल्यानंतर, ‘पुष्पा २: द रूल’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने पुरस्कार मिळाल्यानंतर जवळपास एक वर्षाने त्या पुरस्कारासंबंधित भाष्य केले आहे. अल्लू अर्जुनने सांगितले की, जेव्हा त्याला हा पुरस्कार मिळाला तेव्हा तो दु:खी होता. त्या मागील कारणही त्याने सांगितलं आहे.

हे देखील वाचा – ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अल्लू अर्जुनने अनस्टॉपेबल एनबीकेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “मी दिग्दर्शक सुकुमार यांना एक गोष्ट सांगितली होती की, हा चित्रपट हिट झाला किंवा फ्लॉप झाला तरी मला याची पर्वा नाही. मला फक्त या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, अशी माझी इच्छा आहे.” “टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच एका अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तू म्हटला होतास की, आम्ही व्यावसायिक चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावरील मान मिळवू आणि तू हे करूनही दाखवले, तर आता तुला यावर काय वाटते?” असा प्रश्न अल्लू अर्जुनला विचारण्यात आला होता.

हे देखील वाचा- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश ओक यांनी मतदारांना विचारले दोन ‘भाबडे’ प्रश्न; अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला,“एकदा मी राष्ट्रीय पुरस्कारांची यादी वाचत होतो, त्यावेळी मला त्यात एकही तेलुगू नाव दिसले नाही. यावर मी विचार करत होतो. तेलुगू इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. मी फक्त नागार्जुन सरांचेच नाव पाहिले होते, पण तेही एका खास भूमिकेसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणीच नव्हते. अजून पुरस्कार कोणत्याही कलाकाराला का मिळाले नाही? इंडस्ट्रीतले कलाकार यामध्ये मागे कसे राहिले? जुन्या कलाकारांचे काय? टॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी आहेत, मग आम्हाला पुरस्कार कसा मिळाला नाही? या प्रश्नांनी माझ्या मनात घर केले होते”असे अल्लू अर्जुनने मुलाखतीत सांगितले.

हे देखील वाचा- “दफन करून आलास ना त्याला…”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक

अल्लू अर्जुनने पुढे सांगितले की, “जेव्हा मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा मी आनंदी होण्याऐवजी दु:खी होतो. माझ्या डोक्यात सतत एक गोष्ट फिरत होती ती म्हणजे, हा पुरस्कार जिंकण्यासाठी तेलुगू कलाकारांना इतका उशिर का झाला. सुकुमार आणि मी जेव्हा पुष्पासाठी नियोजन सुरू केले तेव्हाच मी मनात ठरवले होते की, मला राष्ट्रीय पुरस्काराला मिळवायचाच आहे. मी याआधी याबद्दल कुणालाही काही सांगितले नव्हते. मी पहिल्यांदाच हे सांगत आहे. सुकुमारला मी म्हणालो होतो, पुष्पा चित्रपट जास्त चालला नाही तरी चालेल. मात्र यासाठी आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार नक्की जिंकायचा आहे. त्यासाठी तू मला मदत कर.”

Web Title: Allu arjun reveals he felt sad on getting best actor national award for pushpa the rise here is why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 07:37 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

‘Pushpa 2 ’ प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरण: Allu Arjun विरोधात आरोपपत्र, वर्षभरानंतर  23 जणांवर गुन्हा दाखल
1

‘Pushpa 2 ’ प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरण: Allu Arjun विरोधात आरोपपत्र, वर्षभरानंतर 23 जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.