
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त स्टारर “धुरंधर” हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत करताना दिसत आहे. सेलिब्रिटींकडूनही त्याचे कौतुक होत आहे. अक्षय कुमार, हृतिक रोशन आणि विकी कौशल सारख्या कलाकारांनंतर, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने आता “धुरंधर” चे कौतुक केले आहे. अर्जुनने रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांचे आणि क्रूचे कौतुक केले आहे. आता साऊथ अभिनेता या चित्रपटाबद्दल काय म्हणाला जाणून घेऊयात.
चित्रपटातील संपूर्ण कलाकारांचे केले कौतुक
‘धुरंधर’ पाहिल्यानंतर, अल्लू अर्जुनने ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट शेअर करत चित्रपटाला उत्कृष्ट म्हणाला. अल्लू अर्जुनने लिहिले, “मी नुकताच धुरंधर पाहिला. उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट तांत्रिक पैलू आणि उत्कृष्ट संगीताने भरलेला एक उत्तम चित्रपट. माझा भाऊ रणवीर सिंगचा दमदार अभिनय; तो त्याच्या बहुमुखी प्रतिभेने लक्ष वेधत आहे. अक्षय खन्नाचे करिष्माई व्यक्तिमत्व आणि संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि इतर सर्व कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय. सारा अर्जुनचा अभिनयही सुंदर आहे.” असे म्हणून अभिनेत्याने सगळ्यांचे कौतुक केले आहे.
Just watched #Dhurandhar. A brilliantly made film filled with fine performances, the finest technical aspects, and amazing soundtracks. Magnetic presence by my brother @RanveerOfficial, he rocked the show with his versatility.
Charismatic aura by #AkshayeKhanna ji, and the… — Allu Arjun (@alluarjun) December 12, 2025
आदित्य धरने दाखवला आपला पराक्रम
अल्लू अर्जुनने केवळ चित्रपटातील कलाकारांचेच नव्हे तर सर्व क्रू आणि तंत्रज्ञांचेही कौतुक केले. त्याच्या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिले, “संपूर्ण टीमचे अभिनंदन. सर्व तंत्रज्ञ, कलाकार, क्रू, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओचे अभिनंदन.” शेवटी, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांचे कौतुक करताना अल्लू अर्जुनने लिहिले, “या चित्रपटाचे कर्णधार, प्रतिभावान आणि हुशार चित्रपट निर्माते आदित्य धर, तुम्ही एक कुशल चित्रपट निर्माते म्हणून तुमची खरी प्रतिभा दाखवली आहे.” लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना, अल्लू अर्जुनने शेवटी म्हटले, “मला हा चित्रपट खूप आवडला. जा आणि त्याचा आनंद घ्या.”
‘धुरंधर’ने सात दिवसांत २०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला
‘धुरंधर’ने सात दिवसांत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपला वेग कायम ठेवला आहे. या स्पाय-थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन हे प्रमुख भूमिकेत आहेत.