(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्यांचे निधन झाले. वयाच्या ८४ वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही त्यांचे स्मरण केले आणि शोकसंवेदना व्यक्त केली आहे. अभिनेता आता नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेऊयात.
Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित
अक्षय कुमारने पोस्ट केली शेअर
अक्षय कुमारने असरानी यांच्या जाण्याने शोकसंवेदना व्यक्त केली आहे. अभिनेत्याने लिहिले, “असरानीजींच्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे. काही काळापूर्वी ‘शूट हैवान’ चित्रपटाच्या सेटवर आम्ही एकमेकांना मिठी मारली होती. ते खूप गोड व्यक्ती होते. त्यांचा विनोदी काळ अद्भुत होता. मी माझ्या सर्व कल्ट चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे. ‘हेरा फेरी’ ते ‘भागम भाग’, ‘दे दना दन’, ‘वेलकम’ आणि अद्याप प्रदर्शित न झालेले भूत बांगला आणि हैवान… आणि खूप काही शिकलो. आपल्या देशासाठी किती मोठे नुकसान आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, असरानी सर. तुम्ही लाखो आणि लाखो लोकांना हसवले. ओम शांती.” असे म्हणून अभिनेत्याने आपले दुःख व्यक्त केले आहे.
Speechless with grief at the passing of Asrani ji. We had just shared the warmest of hugs just a week back at the shoot of Haiwaan. Bahot pyare insaan the…he had the most legendary comic timing. From all my cult films Hera Pheri to Bhagam Bhag to De Dana Dan, Welcome and now our… pic.twitter.com/yo7wXnGO1Z — Akshay Kumar (@akshaykumar) October 20, 2025
अक्षय कुमार आणि असरानी यांनी वेलकम, हेरा फेरी, भूल भुलैया, दे दाना दान, खट्टा मीठा, भागम भाग, आवरा पागल दीवाना, दिवाने हुए पागल, इंटरनॅशनल खिलाडी यांसारखे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. कॉमेडीमध्ये ही जोडी हिट ठरली होती. तसेच त्यांची कॉमेडी आणि विनोदी पात्राने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे.
असरानी आपल्या कामाबद्दल खूप गंभीर होते. वयाच्या ८४ व्या वर्षीही ते अखंड कार्यरत होते. त्यांनी अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनातही हात आजमावला आहे. अमावाद नो रिक्षावरो या गुजराती चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच पुढे त्यांनी चला मुरारी हीरो बनने, सलाम मेमसाब, हम नहीं सुधरेंगे, दिल ही तो है आणि उडान या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.