
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नानंतर आता ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या त्यांच्या भव्य रिसेप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे. या ग्रँड रिसेप्शनबाबत एकामागोमाग एक अपडेट समोर येत आहेत. तसेच कधी स्थळाबाबत माहिती तर कधी पाहुण्यांची यादी लीक झाल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. या सगळ्या गडबडीत विजय आणि रश्मिकाने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ग्रँड रिसेप्शनबाबत लोकांना खास विनंती केली आहे. आता या दोघांनीही या पोस्टमध्ये काय लिहिले जाणून घेऊयात.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांनी नुकतेच लग्न केले असून, त्यांनी हैदराबादमध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. त्यांच्या टीमने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की ‘विरोश’ वेडिंग रिसेप्शन हे पूर्णपणे फक्त निमंत्रित पाहुण्यांसाठीच असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चाहत्यांनी आणि इतरांनी कार्यक्रमस्थळी येऊ नये, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”
विजय आणि रश्मिकाच्या लग्नाला देशभरातून भरभरून प्रेम मिळत आहे. छोटेखानी खासगी विवाह सोहळ्यानंतर आता ४ मार्चच्या संध्याकाळी हैदराबादमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. सुरुवातीला हा समारंभ तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील मान्यवर, तसेच काही मोठे राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नियोजित करण्यात आला होता.
मात्र देशभरातील प्रचंड उत्साह लक्षात घेऊन आणि पोलिस प्रशासनाशी चर्चा करून पाहुण्यांची यादी आणखी मर्यादित करण्यात आल्याचे समोर आले आहे. गर्दी होऊ नये, वाहतूक कोंडी टाळावी आणि सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पाहुणे, सर्वसामान्य नागरिक तसेच वधू-वरांची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची आहे.
‘Fighter’मुळे ओळख मिळालेला Rishabh Sahni, आता ‘Nagabandham’मध्ये दमदार खलनायक म्हणून झळकणार!
आवश्यकता भासल्यास पुढे अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित पद्धतीने आणखी एक रिसेप्शन आयोजित करण्याचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून इतर शुभेच्छुकांनाही सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश फक्त वैध निमंत्रणपत्र असलेल्या पाहुण्यांनाच दिला जाणार आहे. निमंत्रणाशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही.
दोघांचे कधी झाले लग्न?
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा विवाह २६ फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे पार पडला. या लग्नसोहळ्यात केवळ जवळचे नातेवाईक आणि चित्रपट इंडस्ट्रीमधील मोठमोठे कलाकार उपस्थित राहिले होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते देखील खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या फोटोवर भरभरून प्रतिसाद दिला.