Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उपचार घेण्यापेक्षा आयुष्य संपवून टाकावं असं वाटलं होतं’, कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या संजय दत्तने मांडली व्यथा

संजय दत्त(Sanjay Dutt) गेल्या वर्षी ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमात झळकला होता. त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजयने त्याच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयी भाष्य केलं आहे.

  • By साधना
Updated On: Jan 13, 2023 | 03:20 PM
sanjay dutt

sanjay dutt

Follow Us
Follow Us:

संजय दत्त (Sanjay Dutt) जेव्हा एका चित्रपटाचं शूटींग करत होता तेव्हा त्याला समजलं होतं की त्यांना लंग कॅन्सर (Lung Cancer) आहे. त्यावेळी संजय दत्तला पुढे काय करावं हे खरोखर सुचत नव्हतं. तो काळ खूप भयानक होता. संजय दत्तने  आपलं आजारपण आणि उपचार याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

संजय दत्तने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात (Sanjay Dutt On Cancer Battle) केली आहे. त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. संजयने कर्करोगासारख्या मोठ्या आजारावर मात केली असली तरी एक वेळ अशी होती जेव्हा संजय दत्तला मरण स्वीकारावं असं वाटत होतं.

संजय दत्त गेल्या वर्षी ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमात झळकला होता. त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजयने त्याच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयी भाष्य केलं आहे.

संजय दत्त म्हणाला,‘केजीएफ 2’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मला पाठदुखीचा खूप त्रास होत होता. ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सारखा पाठदुखीचा त्रास होत असल्याने मी औषधं आणि गरम पाणी पित होतो. त्यानंतर एकेदिवशी अचानक मला श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी डॉक्टरना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी मला कर्करोग झाला असल्याचं सांगितलं. पण मला केमोथेपरी घ्यायची नव्हती . त्यामुळे मी आयुष्य संपवण्याची इच्छा व्यक्त केली.

[read_also content=”शाहिद कपूर आणि विजय सेतूपतीचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण, ‘फर्जी’च्या ट्रेलरवर बेस्ट कॉम्बोच्या कमेंट्स https://www.navarashtra.com/gallery/shahid-kapoor-and-vijay-setupati-digital-debut-in-farzi-web-series-nrsr-361426/”]

संजय दत्त पुढे म्हणाला, आमच्या घरात कर्करोगाचा खूप जुना इतिहास आहे. माझी आई नर्गिसचंदेखील कर्करोगामुळे निधन झालं होतं. तसेच माझी पहिली पत्नी रिचा शर्मा हिनेदेखील ब्रेस्ट कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला. मात्र मला कर्करोग झाला तेव्हा माझी पत्नी मान्यता दत्त आणि बहिण प्रिया आणि नम्रता दत्त यांनी माझी खूप काळजी घेतली. डॉक्टरांच्या मदतीमुळे मी या गंभीर आजारावर मात करू शकलो.

Web Title: Sanjay dutt on his cancer battle nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2023 | 03:16 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sanjay Dutt
  • sanjay dutt news

संबंधित बातम्या

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
1

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
3

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
4

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.