मुंबई : मराठी मालिका सृष्टीतील अभिनेत्री केतकी चितळे ही काहीन काही कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. केतकी अनेकदा विविध विषयांवर सोशल मीडियाद्वारे आपले परखड मत व्यक्त करीत असते. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला लोकांच्या रागालाही समोर जावं लागत, तर काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. आता अभिनेत्री केतकी चितळेने सनातन हिंदूंन विषयी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली असून सध्या तिच्या या पोस्टची बरीच चर्चा सुरु आहे.
केतकीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले, ““समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार का आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच” , असं केतकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, “एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृ-पितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू. सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. आणि सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे”. “चार पैश्यात घोषणा करा. जातीयवाद निर्माण करा. सनातनी हिंदू झोपला आहे, याचा फायदा घ्या. जे जागे आहेत त्यांना तुरुंगात टाका व केसेस ठोका. पण लक्षात असू द्या…झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा तो पेटून उठतो”, असंही केतकीने म्हटलं आहे. त्यानंतर काही वेळाने केतकीने तिची इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट केली होती. मात्र तिने तिच्या इंस्टाग्राम हायलाईट्सवर ही पोस्ट सेव्ह केली आहे.