तुम्ही आजवर सरड्याचे नाव ऐकले असेल जो परिस्थतीनुसार आपला रंग बदलतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? देशात असेही काही तलाव आहेत जे काळ, हवामान आणि प्रकाशाप्रमाणे आपला रंग बदलत जातात. रंग बदलण्याच्या या शक्तीमुळे हे तलाव जादुई असल्याचा भास होतो. या तलावांचे पाणी निळा, हिरवा, गुलाबी किंवा अगदी जांभळा रंगात बदलते जे पाहायला फार सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे ठरते. या तलावांचे दृश्य अनेक प्रवास प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करते.
भारतातील ५ जादुई तलाव जे बदलतात आपला रंग; फोटो पाहाल तर तर प्रेमातच पडाल
मणिपूरमधील लोकटक तलाव त्याच्या तरंगत्या गवताच्या तुकड्यांसाठी ओळखला जातो. सूर्यप्रकाशानुसार त्याचे पाणी कधीकधी निळे तर कधीकधी हिरवे दिसू लागते. या तलावाला नॉर्थ ईस्टचा चमत्कार म्हटले जाते.
चेन्नईजवळील पल्लीकर्णी तलाव हे कधी निळे आणि कधी हिरवे रंगात बदलते. पावसाळ्यात त्याचा रंग खूप आकर्षक वाटतो आणि सूर्यास्ताच्या वेळी त्याचे दृश्य मनमोहक दिसते
हिवाळ्यात ओडिशातील चिल्का तलाव हजारो स्थलांतरीत पक्ष्यांचे घर बनते. सूर्यप्रकाश, वारा आणि हवामानानुसार त्याचे पाणी कधीकधी हलके गुलाबी, कधी निळे तर कधी जांभळे बनते
लडाखमधील समितसर तलाव देखील हिमवर्षाव आणि सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे आपला रंग बदलतो. कधीकधी हे सरोवर चमकदार निळे दिसते तर कधीकधी गडद हिरवे दिसू लागते
हिमाचल प्रदेशमधील चंद्रताल तलाव हे सकाळी आणि सायंकाळी आपला रंग बदलते. हे तलाव कधी कधी जांभळ्या रंगाचे दिसते ज्यामुळे याचे दृश्य आणखीनच सुंदर वाटू लागते. फोटोप्रेमींसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे
योग्य हंगामात गेलात तरच तुम्हाला या जादुई तलावांचे खरे सौंदर्य पाहता येईल. उन्हाळ्यात, लडाख आणि हिमाचलमधील तलाव बर्फाशिवाय रंग बदलतात तर हिवाळ्यात, चिलिका आणि लोकटक तलाव पक्ष्यांनी भरलेले असतात.
तुमच्या कुटूंबासह तुम्ही या तलावांना भेट देऊ शकता. ट्रेन, लोकल बस, होमस्टे आणि ऑफ-सीझन ट्रॅव्हलने कमी बजेटमध्ये तुम्ही इथे प्रवास करू शकता.